अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

बीड जिल्ह्यात खासदारांच समाज कारण ,सत्ताधाऱ्यांचे राजकारण ?

बीड दि.८:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्याच्या राजकारणात सद्यस्थितीत सत्ताधारी विकासाच्या प्रश्नावर राजकारण करत आहेत. तर दुसरीकडे खा.डॉ.प्रितमताई मुंडे कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता कोरोना संकटात केवळ जिल्ह्यातील मायबाप जनतेला मदतीचा हात देत आहेत, कोणावरही आरोप-प्रत्यारोप न करता समाजकारण करत आहेत ,असताना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या एका कार्यक्रमात, खासदार आणि आमदार लोकप्रतिनिधी डावलुन? सत्ताधाऱ्यांनी खोडसाळपणा केला? याची चीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आली आहे .अशाप्रकारचे घाणेरडे राजकारण करू नये? अशा प्रतिक्रिया लोकांमध्ये आहेत,
त्याच असा आहे की , स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात, विषाणू चाचणी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले. खरंतर लोकप्रतिनिधी प्रोटोकॉल प्रमाणे या कार्यक्रमाला खासदार व आमदार आमंत्रित करायला हव. कारण हा कार्यक्रम केज विधानसभा मतदारसंघात होता, आणि खासदार रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष पण आहेत. एवढेच नाही तर मागच्या पाच, वर्षात याच ग्रामीण रुग्णालयासाठी. जवळपास 132 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री पंकजाताई व प्रितम ताई या मुंडे भगिनी मुळेच आला, एवढेच नव्हे तर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या 50 जागा जाणार होत्या, त्या केवळ खा.प्रितमताई मुंडे यांच्या अथक प्रयत्नातून कायम राहिल्या, या रुग्णालयासाठी मुंडे भगिनींचे योगदान न भूतो न भविष्यती आहे, उदघाटन कार्यक्रमाला सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक खासदार आणि आमदारांना निमंत्रण पण दिले नाही, एवढेच नव्हे तर पत्रिकेवर नाव नाही?
पंकजाताई पालकमंत्री असताना अशाप्रकारचा घाणेरडे राजकारण कधीच झालं नव्हतं? विशेष म्हणजे जे रुग्णालय प्रशासन अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी घेतलेली भूमिका निषेधार्थ? असून अभ्यागत मंडळांना सुद्धा निमंत्रण पाठवले नाही, इकडे करोना साथ जिल्ह्यात सुरू असून त्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यापासून खासदार प्रितमताई जिल्ह्यातील मायबाप जनतेला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत आहेत, एवढेच नाही तर संकटाच्या काळात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर? जिल्हा प्रशासन यावर? कुठल्याही प्रकारचे आरोप पण केले नाही. केवळ समाजकारण म्हणून काम करताना त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली? दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र संकटात राजकारण करताना खासदार आणि आमदाराला डावललं त्याचा संताप अंबाजोगाई सारख्या सांस्कृतिक शहरात सामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे, खरंतर विभागाच्या आमदारांना बोलावं हा पण राजकीय प्रोटॉकल आहे ,पण उदघाटन कार्यक्रमात आमदार नमिता अक्षय मुंदडा यांचेही नाव कुठेच येऊ दिलं नाही,? अशा प्रकारचं सुडाचे राजकारण ? सत्ताधारी करू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button