प्रशासकीयमहाराष्ट्र राज्य

दि. १२ जुलै ते १८ जुलै २०२० या कालावधितील शासनाचे निर्णय व इतर घडामोडींचा संक्षिप्त आढावा

कोरोना युध्द

१२ जुलै २०२०

  • आज ३३४० रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के, आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- १ लाख ४० हजार ३२५. कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के), ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाइन. ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज १७३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४.४ टक्के.
  • भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या रॅपिड ॲण्टी बॉ‍डिज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत. कंपन्यांमार्फत उत्पादीत किटचा अभ्यास करून दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश. समिती अध्यक्ष- राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, सदस्य- ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी.
  • जुलै महिन्यात आतापर्यंत 9 लाख 26 हजार 140 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • 1 एप्रिल ते 11 जुलै या कालावधीत 1 कोटी 66 हजार 739 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत ५३ देशातून २३९ विमानांव्दारे ३५ हजार ९७१ प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवासी- १२ हजार ५७०, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- १२ हजार २९५, इतर राज्यातील प्रवासी- ११ हजार १०६.
  • जालना येथील कोविड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन.
  • कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांमध्ये काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असून आपली तब्येत चांगली असल्याचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून स्पष्ट.

१३ जुलै २०२०

  • कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्याद्वारे स्पष्ट. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात आढावा. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य होणार नाही या भूमिकेवर बैठकित शिक्कामोर्तब. याबाबत सर्व १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे लेखी निवेदन. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून योग्य सूत्र वापरून निकाल घोषित करणार, कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कमी गुण मिळाले आहेत असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी. मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्र/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे लेखी निवेदन घेऊन निकाल घोषित करणार. विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असल्यास लेखी स्वीकृती घेऊन परीक्षेस बसण्याची संधी, कोविड-१९ चा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव विचारात घेऊन, संबंधित जिल्हाधिकारी तथा आपत्ती निवारण प्राधिकरण यांच्या सल्ल्याने निर्णय. ज्या ९ राज्यांनी परीक्षा रद्द केल्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार.
  • बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती /उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करण्यास कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे बाष्पके संचालनालयाला येणाऱ्या लक्षात घेऊन बाष्पके व पाईपिंगच्या आरेखन मान्यतेसाठी www.mahaboiler.com या पोर्टलवर ऑनलाइन सुविधा सुरू. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्याच्या व्यवसाय सुलभता धोरणाच्या अनुषंगाने आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावण्यासाठी पोर्टलचा प्रारंभ, या सेवेमुळे उद्योजकांचा वेळ, पैसा, शारीरिक व मानसिक त्रास वाचणार. महाराष्ट्रामार्फत देशात पहिल्यांदाच सर्व बाष्पकांना १५ जूनपर्यंत अविरतपणे सुरु ठेवण्यासंबंधी बाष्पके संचालनालयामार्फत निर्णय व प्रमाणीकरणातून सूट.
  • कोविड संदर्भात १ लाख ६७४ हजार गुन्हे दाखल, ३० हजार ३२४ व्यक्तींना अटक, अत्यावश्यक सेवेसाठी पोलीस विभागामार्फत ५ लाख ९१ हजार ८३ पासेसचे वितरण, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल ९१,०४६ वाहने जप्त.
  • कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असली तरी या संदर्भात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यापासून सावध राहण्याचे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन. गरजू लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना फसवण्याचा उद्देशाने प्लाझा दानाबाबत बनावट प्रमाणपत्र तयार केली जात असल्याचे, श्री देशमुख यांचे प्रतिपादन.
  • धारावी परिसरात कोरोना युद्धात सरशी झाल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोना साखळी तोडण्यासाठी नवा “धारावी पॅटर्न” समोर. कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, स्थानिक खासदार, आमदार, महानगरपालिका, यांच्या प्रयत्नांमुळे हे यश. या मोहिमेत पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल या सर्वांचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्यामार्फत अभिनंदन.
  • 1 जुलै ते 12 जुलैपर्यंत 64 लाख 39 हजार 338 शिधापत्रिका धारकांना 10 लाख 85 हजार 470 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • जुलै महिन्यात आतापर्यंत 11 लाख 82 हजार 130 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • ४१८२ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के, बरे होऊन घरी परतलेले रुग्ण – १ लाख ४४ हजार ५०७. ६४२९ नवीन रुग्णांचे निदान , १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के). ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाइन. ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज १९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४.२ टक्के.

१४ जुलै २०२०

  • कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केल्या प्रकरणी कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांच्याद्वारे गंभीर दखल. शासनाचे निर्देश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे श्री भूसे यांचे सूतोवाच.
  • 1 जुलै ते 13 जुलै पर्यंत 70 लाख 68 हजार 597 शिधापत्रिका धारकांना 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • 1 जुलै ते दि . 13 जुलै पर्यंत 12 लाख 81 हजार 126 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 250 विमानांद्वारे 37 हजार 90 प्रवासी मुंबईत दाखल. यामध्ये मुंबईतील प्रवासी- 12 हजार 907 , उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- 12 हजार 646 , इतर राज्यातील प्रवासी- 11 हजार 537 .
  • ४५०० रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- १ लाख ४९ हजार ७ . ६७४१ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के). आज २१३ मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४ टक्के.
  • लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक. ठळक मुद्दे- लॉकडाऊन कालावधीत आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारींची पडताळणी केली जाईल. त्याशिवाय वीजजोडणी कापली जाणार नसल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून स्पष्ट. एकूण वापराच्या विजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून वीज बिलाची पडताळणी करण्याचे बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना डॉ राऊत यांचे निर्देश.
  • मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बकरी ईद आयोजनासंदर्भात संदर्भात ऑनलाइन बैठक, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित. ठळक मुद्दे– कोरोनाची झपाट्याने होत असलेली वाढ रोखण्याचे प्रयत्न. गेल्या 4 महिन्यात सर्व धर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे, त्याचप्रमाणे बकरी ईद साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरीत्या आणि नियमांचे पालन करून साजरी करा, गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक. वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता. यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी आग्रह करु नका.
  • उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण कंपनीची आढावा बैठक. निर्देश- मीटरवरील प्रत्यक्ष रीडिंग घेऊनच देयक द्या. सरासरी देयक टाळा, स्थानिक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून नियोजन करा. धनादेशाद्वारे वीजदेयके भरणाऱ्या ग्राहकांच्या मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करा. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील (कंटेन्मेंट झोन) वीजदेयकाची वसुली वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा. देयक एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना 2 टक्के सवलत , तीन समान हप्त्यात देयक भरण्याच्या सुविधेबाबत ग्राहकांना माहिती द्या. निसर्ग चक्रीवादळामुळे वीजपुरवठा बाधित कोकणातील वीज ग्राहकांचा स्थिर आकार माफ करण्याचा निर्णय.
  • २२ मार्च ते १३ जुलै या कालावधीत १,७६,४१८ गुन्ह्यांची नोंद, ३० हजार ३३० व्यक्तींना अटक, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल, ९१,१२७ वाहने जप्त.
  • मुंबई आणि ठाणे शिधावाटप यंत्रणेच्या दक्षता पथकामार्फत 9 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यामध्ये मध्ये तांदूळ 2150 कि.ग्रॅ. व गहू 2600 कि.ग्रॅ गव्हाचा समावेश.
  • 1 जुलै ते दि. 13 जुलै पर्यंत 868 शिवभोजन केंद्रातून 12 लाख 81 हजार 126 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • 1 जुलै ते 13 जुलै पर्यंत 70 लाख 68 हजार 597 शिधापत्रिकाधारकांना 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.

१५ जुलै २०२०

  • 1 जुलै ते दि.14 जुलैपर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून 13 लाख 81 हजार 32 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • 1 जुलै ते 14 जुलैपर्यंत 77 लाख 52 हजार 163 शिधापत्रिका धारकांना 14 लाख 41 हजार 50 क्विंटल अन्नधान्याचे वाटप
  • ३६०६ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के, बरे होऊन घरी परतलेल रुग्ण – १ लाख ५२ हजार ६१३, ७९७५ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ११ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के), ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाइन. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज २३३ मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.९६ टक्के.
  • बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार असल्याची मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांची पत्रकार परिषदेत माहिती.
  • कोरोना काळात विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण ऑनलाइन साधनांच्या आधारे देता येणे शक्य असल्याने राज्याच्या विविध भागातील गरजेनुसार अशा प्रशिक्षणांचे आयोजन, आरोग्य विषयक कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्याची कौशल्य विकास आणि रोजगार विकास मंत्री श्री नबाब मलीक यांची जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात घोषणा.
  • लहान बालकांचे योग्य पोषण होणे हा अंगणवाडी केंद्रांचा महत्वाचा उद्देश असल्याने कोरोना कालावधीत आवश्यक सुरक्षा उपाययोजना व सावधानता बाळगून या कामात खंड पडू दिला जाऊ नये अशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या सूचना.
  • नागरिकांना स्वस्त दरात मास्क व सॅनिटायजर मिळण्यासाठी त्यांच्या किंमती नियंत्रणात आणण्याबाबत आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उपस्थित. ठळक मुद्दे- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरच्या वापरात वाढ त्यामुळे त्यांच्या किंमती निश्चित करण्यासाठी समितीचे गठण, मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्राकडे मागणी करण्याचा निर्णय. साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मास्क आणि सॅनिटायजरच्या किमती नियंत्रणात आणता येतील का याबाबत केंद्रीय कायदा तपासून विधी व न्याय विभागाने अभिप्राय देण्याचे श्री टोपे यांचे निर्देश.

१६ जुलै २०२०

  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत विविध देशातून २७५ विमानांद्वारे ४० हजार ५९९ प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवासी- १३ हजार ८०५, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- १४ हजार ३३८, इतर राज्यातील प्रवासी- १२ हजार ४५६.
  • २२ मार्च ते १५ जूलै या कालावधीत १,८३,४३५ गुन्ह्यांची नोंद, ३०,६२९ व्यक्तींना अटक.
  • ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’ साठी ‘ महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने 21 लाख 19 हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द.
  • 1 जुलै ते दि . 15 जुलै पर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून 14 लाख 78 हजार 748 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमोओपॅथीक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्याच्या निर्णयाबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले विधान दिशाभूल करणारे, त्यामुळे शासनाची बदनामी झाल्याने याबद्दल श्री पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचे ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांच्याद्वारे श्री पाटील यांना पत्र.
  • अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याद्वारे मुंबईतील रहेजा व हिंदूजा रूग्णालयांतील सुविधा व उपलब्ध औषधांचा साठ्याची तपासणी.
  • सायबर संदर्भात ५४२ गुन्हे दाखल, २८४ व्यक्तींना अटक.
  • ५५२७ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के ,आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- १ लाख ५८ हजार १४०. ८६४१ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के). ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाइन. ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज २६६ मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.९४

१७ जुलै २०२०

  • 1 जुलै ते 16 जुलैपर्यंत 91 लाख 19 हजार 569 शिधापत्रिका धारकांना 18 लाख 29 हजार 80 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • 1 जुलै ते दि.16 जुलैपर्यंत 15 लाख 75 हजार 195 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • कोरोना विषाणु आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी त्यांचा तुटवडा भासू नये या साठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याद्वारे सातत्याने अधिकारी, पुरवठादारांच्या बैठका, रुग्णालये, फार्मसी या ठिकाणी भेट देऊन तपासणी, कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार होणार नाही यासाठी विशेष दक्षता. कोरोना उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधांची बाजारात अवाजवी दर आकारणी व साठेबाजी होत नसल्याबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी खात्री करुन संबधितांविरुध्द कडक कारवाई करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश. रुग्णालयातील फार्मसीमध्ये Tocilizumab या इंजेक्शनची विक्री एमआरपीवर न करता माफक नफा ठेवून करण्याचे श्री शिंगणे यांचे आवाहन. येत्या आठवडयात मॉयलान कंपनीमार्फत रेमडेसीवीर इंजेक्शन बाजारात येणे अपेक्षित, हेटेरो हेल्थकेअर, मार्फत गुजरात येथील नवसारी येथे उत्पादन लवकरच सुरु. सिपला कंपनीमार्फत गुजरात येथे उत्पादन सुरु करण्याचा प्रयत्न. टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) चे पर्यायी औषध ईटियोझुलॅब Itiozulmab हे बायोकॉन (Biocon) या कंपनीमार्फत बाजारात उपलब्ध.
  • कोरोना पार्श्वभूमीवर बकरी ईद साधेपणाने साजरी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित. (१) सध्याच्या संसर्गजन्य परिस्थितीत सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, घरीच अदा करावी. (२) सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास ऑनलाइन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. (३) नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. (४) प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. बकरी ईद निमित्त त्यात शिथीलता देता येणार नाही. (५) नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. (५) कोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक. (६) या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत आणखी काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे आवश्यक.
  • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याद्वारे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा. महत्वाचे निर्देश- कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याद्वारे गणेशोत्सव सुरक्षितरीत्या आणि आरोग्याचे कुठ्लेही विघ्न येऊ न देता पार पडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य अपेक्षित, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अजूनही कोरोनाचा संसर्ग प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची ये-जा पाहता पुरेपूर काळजी घेणे आवश्यक, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गृह विभागाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक. या काळात चेकपोस्ट अधिक सतर्क करा. पुरेसा पोलीस बंदोबस्त, आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्या. गावात आरोग्य शिबिरे घ्या, उत्सवाचे स्वरूप साधे ठेवा, , शारीरिक अंतर ठेवा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी चाचणी प्रयोगशाळांच्या क्षमता वाढवता येतात का ते बघा, आयसोलेशन बेड्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवा. रुग्णवाहिका पुरेशा राहतील हे पाहा.
  • 52 हजार 434 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जुलै ते 16 जुलैपर्यंत 91 लाख 19 हजार 569 शिधापत्रिका धारकांना 18 लाख 29 हजार 80 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • 1 जुलै ते दि . 16 जुलै पर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून 15 लाख 75 हजार 195 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना 30 जुलैपासून लोकल प्रवासासाठी ‘क्यू-आर’ कोडचा ई-पास आवश्यक, कार्यालये, आस्थापनांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांची माहिती संबधित नोडल अधिका-यांकडून मंजूर करून घेणे आवश्यक, संपर्क- – श्री. प्रमोद सावंत किंवा देवांश शुक्ला किंवा ज्योतीमणी. टेक्नॉलॉजी सेल, पाचवा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सीपी ऑफिस कंपाऊनड, डॉ. डी.एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटच्या समोर, मुंबई –400001. भ्रमणध्वनी- 8828119706
  • 74 प्रकारचे विविध कामे करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ दि. 1 जुलैपासून देण्याचा आरोग्य विभागाचा शासन निर्णय जारी.
  • २२१७ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के, घरी परतलेले रुग्ण- १ लाख ६० हजार ३५७. ८३०८ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के). ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाइन. ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज २५८ मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.९१ टक्के.

१८ जुलै २०२०

  • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचा सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद. ठळक मुद्दे- विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या लॉकडाऊनच्या काळा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी करा . जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग मिळवा, शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, लॉकडाऊन लावून रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल तरच तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम असल्याने सणवार साजरे करतांना नवे कंटेनमेंट क्षेत्र वाढू देऊ नका, प्रत्येक जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रांवर सर्व सुविधा व्यवस्थित ठेवा, रुग्णालयांच्या ठिकाणी ऑडिटर म्हणून अधिकारी नेमा, अव्वाच्या सव्वा खर्च लावणार नाहीत हे कटाक्षाने बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयांत त्रास होऊ नये याची काळजी घ्या, रुग्णांना व्यवस्थित माहिती द्या. विश्वस्त संस्थेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १० टक्के रुग्णांवर मोफत उपचाराच्या काटेकोर अंमलबजावणीवर लक्ष ठेवा. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव अशा शहरांमध्ये अधिकाधिक ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करा. प्रत्येक जिल्ह्यात, विभागांत नोडल टेस्टिंग अधिकारी नेमा. औरंगाबाद, मुंबई, ठाणे , पालघर, रायगड, यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ॲन्टीजेन चाचणी वाढवा. १० जिल्ह्यांत आरटीपीसीआर प्रयोगशाळा नाहीत त्या तातडीने उभारण्याची कार्यवाही पूर्ण करा, २ ह्जार रुपये प्लाझ्मा दात्याला देत आहोत, ही माहिती मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सांगा, संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील शहरांमध्ये युनिफाईड कमांड सेंटर स्थापन करा, बेड्सचे नियोजन संगणकीकृत करा, लक्षणे नसलेल्या रुग्णांना बेड्स देऊ नका, त्यामुळे गरजू रुग्णांना बेड्स उपलब्ध होतील, २४ तासांत चाचणीचा अहवाल आला पाहिजे, रुग्णवाहिकांची गरज लक्षात घेता वाहने अधिग्रहित करा , मुंबईत मिशन सेव्ह ह्युमन लाइफ सुरु आहे, अशीच कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांनी करावी. ग्राम दक्षता समित्या सक्रीय करा.
  • सिप्ला बहुराष्ट्रीय औषध कंपनीमार्फत ३ कोटी रुपयांची रक्कम राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा, या रकमचा धनादेश कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल चोप्रा यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत २९८ विमानांद्वारे ४२ हजार ९५८ प्रवासी मुंबईत दाखल. यातील मुंबईचे प्रवासी- १४ हजार ६११. उर्वरित महाराष्ट्र प्रवासी – १४ हजार ९९२, इतर राज्यातील प्रवासी -१३ हजार ३५५
  • लॉकडाऊनच्या काळात सायबर संदर्भात ५४६ गुन्हे दाखल, २८७ व्यक्तींना अटक.
  • २२ मार्च ते १७ जूलै या कालावधीत कलम १८८ नुसार १,८९,९१६ गुन्ह्यांची नोंद, ३०,८९४ व्यक्तींना अटक.
  • पोलीस दलामध्ये १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्या विभागाला सूचना. डिसेंबर अखेर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश. यामध्ये पोलीस शिपाई गट क संवर्गातील २०१९ या भरती वर्षात रिक्त असलेली ५२९७ पदे, २०२० या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामामुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील ६७२६ पदे, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ पदांचा समावेश.
  • ५३०६ रुग्णांची घरी रवानगी. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के, आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेले रुग्ण- १ लाख ६५ हजार ६६३. आज ८३४८ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर उपचार सुरू. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख २२ हजार ५६४ नमुन्यांपैकी ३ लाख ९३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.७६टक्के). आज १४४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.८५ टक्के.

इतर निर्णय आणि घडामोडी

१४ जुलै २०२०

  • अनुसूचित क्षेत्रांतर्गत (पेसा क्षेत्र) १३ जिल्ह्यातील ५ हजार ९८२ गावांसाठी ५ टक्के थेट अबंध निधी योजनेचा १६० कोटी ७३ लाख रुपये लोकसंख्येनुसार वितरीत करण्यात आल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
  • माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री डॉ. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त साहित्य संस्कृती मंडळ निर्मिती ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे आणि दै. सत्यप्रभाच्या विशेषकांचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन.
  • जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन. सलाम बॉम्बे फाऊंडेशनमार्फत ब्युटी आणि वेलनेस, घरगुती उपयोगाच्या वस्तुंची दुरुस्ती, मोबाइल रिपेरिंग, बेकरी, ज्वेलरी डिझाइन, माध्यमे, करमणूक आणि क्रीडाविषयक कौशल्य प्रशिक्षण, हे प्रशिक्षण सुलभ व्हावे म्हणून रोटरी क्लब ऑफ बॉम्बेमार्फत विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण.
  • सरळसेवा भरती आणि पदोन्नतीकरीता असलेल्या 100 पदांच्या बिंदुनामावलीत एससी, एसटी, विजाभज, ओबीसी, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक संवर्गावरील अन्याय दूर करण्यासाठी संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा, निर्णयप्रक्रिया राबविताना कोणावरही अन्याय करु नका, अशा, विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या संबंधितांना विशेष बैठकित सूचना.
  • बेरोजगार युवकांनी आधार क्रमांक तथा नोंदणी अद्यावत करण्याचे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर यांचे आवाहन.
  • जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती. आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाइन तर जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑफलाइन पद्धतीने करण्यात येतील.

१५ जुलै २०२०

  • वाघांच्या अधिवासाला धोका पोहचण्याची शक्यता असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका, अशी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची केंद्रीय रेल्वेमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना विनंती
  • पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नकार ही समाधानाची बाब असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया.
  • महंमद द मेसेंजर ऑफ गॉड , या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी, रजा अकादमी या संस्थेने सायबर विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार, या चित्रपटाचा प्रसारणावर बंदी घालण्यासाठी केंद्र शासनास पत्र पाठवले असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती.
  • मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.

१६ जुलै २०२०

  • अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसारख्या दुर्गम भागातील विद्युतीकरण न झालेल्या काही आदिवासी व दुर्गम गावांचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा. निर्देश – या गावांचे विद्युतीकरण पारंपरिक पद्धतीने करा. दुर्गम भागातील काही गावात वीज पोहचली नसल्यास तेथे विद्युतीकरण करण्यासाठी आराखडा तयार करा, वनक्षेत्रात वीजयंत्रणा उभी करण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळाली नसल्यास वनविभागासोबत तातडीने बैठक घ्या.
  • कोरोनाचे संकट व त्यानिमित्त घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचा यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय, इतर कुणीही वाढदिवस साजरा करु नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करु नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे श्री पवार यांचे आवाहन.
  • सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या (एसआरएस) प्रकाशित अहवालात मातामृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक, महाराष्ट्राचा मातामृत्यू दर ४६. पहिल्या स्थानावर केरळ, त्याचा मातामृत्यू दर ४३.
  • राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याव्दारे अभिनंदन.
  • सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांचे मार्च व एप्रिल महिन्यांचे मानधन येत्या आठवड्याभरात संबंधितांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी सांस्कतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
  • निवृत्त जेष्ठ सनदी अधिकारी नीला सत्यनारायणन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे,उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याद्वारे शोक व्यक्त.
  • मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याद्वारे वर्षा निवासस्थानी आढावा. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील उपस्थित.
  • ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगाकडून 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी प्राप्त. लवकरच या निधीचे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरण. यापूर्वी इतक्याच रकमेचा अबंधीत निधी प्राप्त. त्यामुळे आतापर्यंत 2 हजार 913 कोटी 50 लाख रूपये इतका निधी प्राप्त झाल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
  • व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची काळजी व वेळेवर योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी 6 पशू वैद्यकीय अधिकारी (गट-अ) यांची नव्याने पदे भरण्यासाठी सेवा प्रवेश नियमांना मंजुरी देण्यात आल्याची वन मंत्री संजय राठोड यांची माहिती.

१७ जुलै २०२०

  • निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याद्वारे आढावा. निर्देश- कुठलाही नुकसानग्रस्त मदती पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या, चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रस्ते,वीज पुरवठा मोबाइल कनेक्टीव्हीटीची कामे विनाविलंब पूर्ण करा. विशेष निधी- रायगड – 372 कोटी 97 लाख 16 हजार, रत्नागिरी- 116 कोटी 78 लाख 69 हजार, सिधुदुर्ग – 37 . 19 लाख, असे एकूण 490 कोटी
  • मौजे भोसे (जि. सांगली) येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचविण्याबाबत पर्यावरण आणि पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्याद्वारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती.
  • मालाड मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजूच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे निर्देश. मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत घोषित.
  • महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत अकोला आणि अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात येत असलेल्या ‘गोट बँक’ उपक्रमासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कारखेडा कृषी उत्पादक कंपनी,अकोला यांच्यामध्ये सामंजस्य करार. बांबूपासून निर्मित राख्यांच्या सचित्र यादी पुस्तकाचे (कॅटलॉगचे) प्रकाशन.
  • भारत-पाकिस्तान दरम्यान १९६५ साली झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या, मेजर जनरल पी. व्ही. तथा पद्मनाभ विद्याधर सरदेसाई यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत शोक व्यक्त.
  • महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2028 अंतर्गत 2 हजार कोटी रुपयांच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी

१८ जुलै २०२०

  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.
  • विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचे वृत्त इन्स्टाग्रामवर टिपल्यानंतर या किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी भारतीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करण्याच्या मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना सूचना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button