डॉ गणेश ढवळे यांच्या निवेदनाचा दणका ; ३ वर्षांपासून वाकलेले विद्युत खांब ३ तासात सरळ उभे केले

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे बेलगांव येथिल महादेव शेळके यांच्या शेतात मुख्य विद्युत पुरवठा करणारी सोमनाथवाडी ते बेलगांव ते लिंबागणेश ते पिंपरनई विद्युत खांब ३ वर्षापासून वाकलेले होते. आण्णा शेळके ग्रां.पं.स.यानी सांगितले लिंबागणेश येथिल महावितरणचे कर्मचारी यांना वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु फक्त बघु एवढंच म्हणत असत आणि काम करण्यासाठी मात्र येत नसत.

दि. २४/०५/२०२० रोजी महादेव शेळके यांनी डॉ.गणेश ढवळे यांना फोन करून वाकलेल्या खांबामुळे शेतीतील मशागत करण्यास अडचण येत असुन अपघात होण्याची दाट शक्यता आहे असे सांगितले, त्यानंतर डॉ.गणेश ढवळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली,ग्रांमस्थांची समस्या जाणून घेतली. आणि त्यानंतर लिंबागणेश येथिल महावितरण कार्यालयात जाऊन येथिल आपरेटर ,लाईनमन यांच्या समक्ष मुख्यमंत्री उदृधवजी ठाकरे , ऊर्जामंत्री नितिनजी राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजयजी मुंडे यांना महावितरण बीड चे कार्यकारी अभियंता श्री बोबडे आणि जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार ई-मेलद्वारे पाठवली. त्यानंतर दुपारी १२ ते ३ दरम्यान लिंबागणेशचे लाईनमन शेळके आणि ईतर त्यांचे सहकारी यांनी बेलगांव येथे जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने वाकलेले ५-६ पोल सरळ केले. ३ वर्षांपासून वाकलेले खांब ३ तासात सरळ केल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर काही दुर्घटना घडण्यापुर्वीच वाकलेले खांब सरळ केल्यामुळे समाधान व्यक्त केले.बेलगावकरांचा प्रश्न तातडीने महावितरणच्या कर्मचा-यांनी सोडवल्यामुळे समाजसेवक डॉ.गणेश ढवळे यांनी महावितरणचे आभार मानले आहेत.या गंभीर प्रश्नाची बातमी साप्ताहिक आठवडा विशेषने आपल्या न्यूजपोर्टल ( https://www.athawadavishesh.com/7554 )व इतर माध्यमातून दाखवली होती.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.