दत्त सेवाभावी संस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी
अंबाजोगाई: जिल्ह्यात सतत दुष्काळ पडत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामिण भागातील सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे.अशा परिस्थितीत मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्यास अनेक पालक व कुटुंबे ही असमर्थ ठरत आहेत. त्यातूनच यापुर्वी अनेक शेतकरी,शेतमजुर बांधवांनी उपवर मुलींचा विवाह करता येत नसल्याच्या कारणाने आत्महत्येचे मार्ग स्विकारले आहेत.तेंव्हा ग्रामिण भागातील शेतकरी,शेतमजुर व मध्यवर्गीय कुटुबांना सहकार्य व मदत करण्याच्या विधायक भावनेतून व सामाजिक बांधिलकी म्हणुन दत्त सेवाभावी संस्थेच्या वतीने शुक्रवार,दि.17 मे रोजी सायंकाळी 5 वाजता सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 11 जोडप्यांचा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह संपन्न झाला.यामुळे शेतकरी व शेतमजुर कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला.
सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याकरीता प्रथम इच्छुक कुटुंबाच्या वतीने 11 वर-वधुंची नोंदणी करण्यात आली. या करिता वधु-वराचे दोन पासपोर्ट फोटो, वयाचा दाखला (टी.सी.झेरॉक्स),आधार कार्ड,रहिवाशी दाखला यासह नाममात्र नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते. संस्थेच्या वतीने वधुसाठी शालु, वरासाठी ड्रेस (शेरवाणी) आणि संसार उपयोगी वस्तु भेटस्वरूपात देण्यात आल्या.अत्यंत शिस्त बद्धरीत्या,देखणा व नियोजनबद्ध उपक्रम राबवून दत्त सेवाभावी संस्थेने ग्रामिण भागात चांगला उपक्रम सुरू केला आहे.या विवाह सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सिरसाट,जिल्हा परिषद सदस्य संजय गिराम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र वालेकर,सरपंच ज्ञानोबा जाधव,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विलास जगताप,बंडु चाटे, मेघराज सोमवंशी, उजनीचे सरपंच भारत गायकवाड,सुधाकर काळुंके,सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल,धिमंत राष्ट्रपाल,सिनेअभिनेत्री रेणुका शहाणे,सुभाष चव्हाण,पत्रकार गोविंद केंद्रे,संजय रानभरे, विश्वजीत गंडले,धनंजय जाधव,सितलिंग शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आयोजक,दत्त सेवाभावी संस्था, बागझरीचे अध्यक्ष प्रशांत दहिफळे,हणुमंत गायकवाड (उपाध्याक्ष), अशोक पालके (सचिव),कमलाकर मिसाळ,अरविंद मिसाळ,वसंत उदार, लालासाहेब लोंढे, नितीन वाघमारे,बापु शिंदे,जितीन हुडे, मारूती मस्के,राजेश उजगरे,अशोक मस्के, सुरज ताटे आदींनी परिश्रम घेतले.विवाह सोळह्यासाठी वधु-वरांचे माता-पिता,नातेवाईक यासह सुमारे पाच हजार लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता.