सामाजिक

मानवी जीवनात सोळावे वर्षे महत्त्वाचे ;ह.भ.प.अनिल महाराज जोशी माजलगावकर यांचे प्रतिपादन

देवी भागवत कथा व पारायण सोहळयाची आज परळीत सांगता

परळी वैजनाथ |प्रतिनिधी : दि. 20 मानवी जीवनामध्ये सोळावे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असून स्वामी विवेकानंद यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी संन्यास घेतला, संत ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाचे लिखाण पूर्ण केले, भगवान गौतम बुद्ध यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जगाला शांतीचा संदेश दिला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच स्वराज्य स्थापनेच्या संकल्प केला होता असे प्रतिपादन प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प.अनिल महाराज जोशी माजलगावकर यांनी केले. एकुणच आपल्या आयुष्यात सोळावे वर्ष महत्वाचे असून अभ्यास आणि खेळासोबतच आपले भविष्य निश्चित करण्यासाठीचे सोळा हे महत्वाचे वय आहे. त्यामुळे विद्यार्थी विशेषत: युवकांनी आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी पुढे जायला पाहिजे असे ते म्हणाले.
परळी वैजनाथ येथे वैद्यनाथ औद्योगिक वसाहत सभागगृहात दिनांक 14 जानेवारी ते 21 जानेवारी 2019 दरम्यान श्री रामलिंग चौंडेश्वरी मातेच्या पौष पौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प.अनिल महाराज जोशी बोलत होते. श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व देवी भागवत कथा सोहळ्याची आज सोमवार दि. 21 जानेवारी रोजी सांगता होणार आहे. सकाळी 6 वाजता होमहवन , 8 वाजता श्री रामलिंग चौंडेश्वरी मातेच्या प्रतिमेची व ग्रंथदिंडीची भव्य शोभायात्रा परळी शहराच्या विविध मार्गावरून निघणार आहे तसेच सकाळी 10 ते 11 वाजता ह.भ.प.अनिल महाराज जोशी हे देवी भागवत कथेची सांगता होणार असून दुपारी 11 ते 1 वा. ह भ प . अनिल महाराज जोशी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने देवी भागवत कथेची सांगता होणार आहे .तरी सर्व कोष्टी समाज बांधवांनी व भाविक भक्तांनी या ग्रंथ दिंडीमध्ये व चौंडेश्वरी माताच्या पालखीमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन परळी कोष्टी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान ह.भ.प.अनिल महाराज जोशी माजलगावकर यांनी उपस्थित भाविकांना बोलताना सांगितले की , देवीला पौणिमेला पुरणाचा नैवेद्य दाखवावा त्याने मनोरथ पूर्ण होते.आमावस्येला खिर किंवा पायसचा नैवेद्य दाखवावा त्याने पिञाचा वुध्दार, होतो पिञ रूणातून मुक्त होण्यासाठी हे करावे.याप्रमाणे देवीला तिथीप्रमाणे नैवेद्य कोणता दाखवा तसेच 14 मुखी रुद्राक्ष याची विविध माहिती विषद केली. यावेळी असा कसा माझा भोळा शंकर व हे माझ्या भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची यासह विविध भक्ती गीते ह.भ.प. जोशी महाराजांनी गायली. या भक्ती गीतांना उपस्थित भाविक भक्तांनी टाळयांची साथ दिल्याने मंडप परिसर भक्तीपर झाला होता. यावेळी तबला साथ ज्ञानेश्वर महाराज कतारे, अविनाश महाराज शिंदे, गायक राजेभाऊ महाराज आंधळे, हार्मोनियम वृक्षराज महाराज आंधळे यांनी दिली. देवी भागवत कथेस हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कु.सोनाली रविंद्र नंदिकोले यांनी सुरेख व आकर्षक अशी रांगोळी काढल्याने रांगोळी भाविकांची लक्ष वेधून घेत होती.

आज सांगता

परळी येथे चालू असलेल्या श्री चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व देवी भागवत कथा कार्यक्रमाची सांगता आज सोमवार दि.21 जानेवारी रोजी होत आहे. मागील सहा दिवसांपासून अत्यंत भक्तीपूर्ण व तेवढ्याच उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमामुळे परळीचे वातावरण अधिक धार्मिक झाले आहे. आज सोमवार दि.21 जानेवारी पारायण व देवी भागवत कथेची सांगता होणार आहे. सकाळी 6 वा. होमहवन, 8 वा. ग्रंथदिंडी व पालखी मिरवणूक होत असून भागवत कथा सकाळी 10 ते 11 व काल्याचे किर्तन सकाळी 11 ते 1 वा. ह.भ.प.अनिल महाराज जोशी माजलगावकर यांचे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button