सोयगाव,दि.२२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―शेतीचा जुना वाद आणि सध्य स्थितीत सुरु असलेल्या पाईपलाईनच्या वादातून झालेल्या भांडणात एकाच कुटुंबातील चौघा बाप लेकांनी शेतकऱ्याला त्याच्या घरासमोर जावून उचलून फेकून त्याचा खून केल्याची घटना कंकराळा ता.सोयगाव गावात शुक्रवारी पहाटे घडली थेट शेतकऱ्याच्या घरासमोर जावून संजय धना परदेशी (पिता) अमोल संजय परदेशी,सागर संजय परदेशी,आणि सुनील परदेशी(सर्व रा.माळेगाव पिंपरी) व सह आरोपी यांनी संग्राम ईश्वर परदेशी(रा.कंकराळा)यांनी त्याचे मोटारसायकलद्वारे या चौघांना मदत करून यापैकी चौघांनी उचलून रस्त्यावर आपटून या शेतकऱ्याचा खून केला आहे.दरम्यान गंभीरअवस्थेत शेतकऱ्याला अधिक उपचारासाठी जळगावला घेवून जात असता,त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात चौघा बाप लेकांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोयगाव पोलिसांनी या चौघे संजय धना परदेशी(पिता)अमोल संजय परदेशी,सागर संजय परदेशी,आणि सुनील परदेशी यांना माळेगाव(पिंपरी)गावातून शिताफीने अटक केली आहे.या घटनेमुळे कंकराळा गावात तणावाचे वातावरण पसरले होते.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंकराळा गावातील शेतकरी पदमसिंग महारु राजपूत(महेर)याची कंकराळा शिवारात शेती आहे.याच शेतकऱ्याच्या बाजूला माळेगाव(पिंपरी) येथील संजय धना परदेशी यांची शेती असून त्यांचा व मयताचा शेतीच्या जुन्या वादातून आणि सध्य स्थितीत असलेल्या धरणाच्या पाईपलाईन वरून गेल्या पंधरा दिवसापासून वाद सुरु होता.या वादाचे शुक्रवारी भांडणात रुपांतर झाल्याने मृत पदमसिंग राजपूत याच्या घरासमोर येवून चौघांनी येवून त्याला घरासमोर उचलून फेकून रस्त्यावर आपटले त्यामध्ये त्याच्या मेंदूला मार लागून मोठा रक्तस्राव झाल्याने गावातील काही ग्रामस्थांनी त्याला जळगावला सामान्य रुग्णालयात उपचारासाठी घेवून जात असतांना त्याचा पहूर ता.जामनेर नजीक रस्त्यातच मृत्यू झाला आहे.या प्रकरणी मयताचा मुलगा जयसिंग पदम परदेशी(वय २८)याच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच सिल्लोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,दिलीप तडवी,सागर गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी मृताच्या कुटुंबियांकडून घटनेची माहिती घेवून त्यांच्या अक्रोशामुळे मयताच्या कुटुंबियांच्या सांत्वन केले.
घराच्या दारातून मृत्युच्या दारात-
चहा पिवून घराबाहेर पडलेले पदम राजपूत(मेहेर) हे अचानक समोर आलेल्या चौघे बाप लेकांच्या दृष्टीस पडताच त्यांनी मयताला उचलून फेकून रस्त्यावर आपटल्याने चहा घेवून घराच्या दरवाज्याच्या बाहेर पडलेल्या शेतकऱ्याला थेट मृत्यूच्या दारात उभे राहावे लागले होते.या घटनेमुळे कंकराळा गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतावर शवविच्छेदन करण्यात येवून पोलीस बंदोबस्तात कंकराळा गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी विशेष पथकाचे शांताराम सपकाळ,विष्णू ढाकणे,जमादार संतोष पाईकराव,दिलीप तडवी,सागर गायकवाड,आदींच्या पथकाने घटनेचा पंचनामा करून घटनास्थळावरील रक्ताचे स्राव तपासणीसाठी घेतले आहे.याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षका मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,सागर गायकवाड,दिलीप तडवी,अविनाश बनसोडे,शांताराम सपकाळ,विष्णू ढाकणे आदि पुढील तपास करत आहे.