नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून पाटोदा नगरपंचायतने तात्काळ डास रोधक व जंतूनाशकांच्या फवारण्या कराव्यात – उमर चाऊस
पाटोदा:गणेश शेवाळे―गेल्या काही दिवसात परतीच्या पावसाने नागरिकांना चांगलेच हैराण केले आहे. शहरातील जिल्हा रुग्णालयात व इतर आरोग्य केंद्रात डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या रोगांचे रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे राष्ट्रीय कॉग्रेस युवानेते उमर चाऊस यांने कॉग्रेसच्या वतीने आरोग्य विभाग व नगरपंचायतला खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत विनंती केली याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसांत परतीचा पाऊस पाटोदा तालुक्यात चांगला झाला असल्यामुळे शहरातील खड्ड्यामध्ये जागो जागी पाणी साचले असल्याने मच्छरांचा सुळसुळाट तर दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत डेंगू,मलेरिया व इतर साथीच्या आजाराने डोके काढले असल्याने पाटोदा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, नगरपंचायत व जिल्हा आरोग्य विभागाकडून तातडीने आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात तसेच रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. पाटोदा शहरात नगरपंचायतने व ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभागाने डास रोधक व जंतूनाशकांच्या फवारण्या कराव्यात तसेच साथीचे आजार थांबवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व जनजागृती करावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने युवानेते उमर चाऊस यांनी केली आहे