ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यवर्धा जिल्हाशेतीविषयक

किसानपुत्र अन्नत्याग आंदोलन ; आर्वीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित

वर्धा दि.१९: आर्वी येथे लाक्षणिक किसानपुत्र आंदोलनाची सुरवात स्मृतिशेष साहेबराव करपे आणि त्यांचे कुटुंबीय यांना विनम्र शिवांजली अर्पण करून झाली. शिवाजी चौक येथे संपन्न झालेल्या सदर आंदोलनाला आर्वी येथील अनेक मान्यवरांनी भेट देवून शेतकर्यांविषयी सदभावना व्यक्त केल्या.
प्रा.संजय वानखेडे यांचे सह आर्वी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष वीरेंद्र कडू, अनिलजी गोहाड सुरेंद्रजी जाणे, सचिव प्रशांत ढवळे तथा राजेश सोळंकी, संतोष डंभारे, प्रशांत नेपटे, धनराज मांगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक प्रफुल्ल क्षीरसागर, शुभम राजे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता जाणे, शुभांगी डंभारे, सीमा साळुंखे, मृदुल जाणे सखी मंचच्या अलका कहारे, शुभांगी गाठे, काळमोरे, माजी जि.प.सदस्य गजानन गावंडे, राम निस्ताने, विशाल चौधरी उपस्थित होते.
बाळा जगताप,आर्वी विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार अमरबाबु काळे, पत्रकार दशरथ जाधव, परवेज साबीर तसेच आर्वीतील जनमान्य नागरीक एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनात उत्स्फूर्त पणे सहभागी झालेत. या मान्यवरांसह अनेक शेतकरी बांधवांनी उपोषण मंडपाला भेटी देवून उपोषणकर्ते व आयोजक यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्यात. सुत्रसंचालन वीरेंद्र कडू यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button