-
अन्याय विसरून राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम प्रामाणिकपणे करणार-माजी आ.पृथ्वीराज साठे
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत कॉर्नर बैठक
अंबाजोगाई (प्रतिनिधी): ही लोकसभेची निवडणूक श्रीमंत विरूद्ध सामान्य शेतकर्याचा मुलगा अशी होत असून देशासमोर आज अनेक प्रश्न आहेत.पाच वर्षापुर्वी लोकांची दिशाभूल करून सत्तेत आलेल्या भाजपाच्या राजवटीला लोक कंटाळले आहेत. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्य घटना बदलण्याचा घाट विद्यमान सत्ताधारी यांनी घातला आहे. त्यामुळे देशाची घटना वाचविण्याचे मोठे आवाहन भारतीय जनते समोर आहे.कदाचित देशातील ही शेवटची निवडणूक असले कारण भाजप सत्तेत आल्यास पुन्हा निवडणूका होणार नाहीत असे भाजपाचेच नेते जाहिरपणे बोलत आहेत. बजरंगबप्पा सोनवणे हे तगडे उमेदवार असून साखर कारखान्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात त्यांनी ऊसाला सर्वाधिक भाव दिला आहे.याउलट वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना कर्जबाजारी करणार्या व भावनिक राजकारण करणार्या भाजपाच्या नेत्यांना पराभूत करा असे अवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केले.तर यावेळी बोलताना आपण स्थापने पासून म्हणजे 1999 पासुन राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणुन काम करीत आहोत.पक्षाचा आदेश माणून व पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी यापुढेही काम करत राहू गेल्या सात वर्षात पक्षाची ध्येयधोरणे सामान्य माणसापर्यंत पोहोंचवली.परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासुन पक्षात आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांना जाणवली. कार्यकर्ते मला प्रश्न विचारत आहे.मी कार्यकर्त्याला काय उत्तर देवू असा प्रश्न उपस्थित करून अन्याय विसरून राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी सांगितले.
अंबाजोगाई येथील प्रशांतनगर भागात माजी आ.पृथ्वीराज साठे व नगरसेवक बबनभैय्या लोमटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना,रिपाइं गवई गट,रिपाइं कवाडे गट, रिपाइं एेक्यवादी, मानवी हक्क अभियान आणि युवा स्वाभिमानी पक्ष यांचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या प्राचारार्थ गुरूवार,दि.28 मार्च रोजी मतदार संपर्क अभियान व जाहिर सभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, लोकसभेचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे, माजी आ.पृथ्वीराज साठे,जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील,नगरसेवक बबनभैय्या लोमटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख,माजी जि.प.सदस्य राजपाल लोमटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे,अमर देशमुख, राजेश्वर चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेसाहेब औताडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजित लोमटे, नगरसेवक अशोक मोदी,नगरसेवक शेख रहिम,नगरसेवक अनिस अन्सारी,नगरसेवक इस्माईल गवळी, नगरसेवक सय्यद असदभाई,नगरसेवक शमशोद्दीन काझी,नगरसेवक मिलींद बाबजे,बाळासाहेब सोनवणे,बालासाहेब देशमुख,माजी उपनगराध्यक्ष शेख नबी,माजी नगरसेवक गौतम सरवदे,विष्णु चाटे,शेख रौफ,रवीकिरण देशमुख, प्रविण देशमुख, बन्सीअण्णा जोगदंड, अंजलीताई पाटील, सविता मेंढके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उल्हास पांडे,माजी जि.प.सदस्य अशोक उगले,दत्ता सरवदे
बालाप्रसाद बजाज, मुबीन देशमुख,अतहर जाहगीरदार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे, नगरसवेक बबनराव लोमटे,राजेश्वर चव्हाण, बन्सीअण्णा जोगदंड आदींची यावेळी भाषणे झाली. या प्रसंगी माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी बजरंगबप्पांना विजयी करण्यासाठी आपण गावोगावी जावून प्रचार करीत आहोत. अंबाजोगाई तालुक्यातून मताधिक्यदेवू पवार साहेबांचा विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोंचवू असे साठे यांनी सांगितले तर यावेळी ना.मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आश्वासीत करत माझे व माजी आ.पृथ्वीराज साठे यांचे नाते हे राजकारणाच्या पलीकडचे आहे.ते मित्रत्वाचे नाते आहे. त्यामुळे यापुर्वी काही चुका झाल्या असतील तर त्याची जबाबदारी मी घेतो व आपणास शब्द देतो की जोपर्यंत राजकारणात धनंजय मुंडेंचा मानसन्मान आहे तोपर्यंत साठे साहेबांचा मान सन्मान कायम राहिल साठे साहेबांच्या राजकिय भवितव्याची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये गट तट ठेवू नयेत सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.प्रचार सभेचे सुत्रसंचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमर देशमुख यांनी करून उपस्थितांचे आभार शेख जावेद शेख खलील यांनी मानले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेस मोठ्या संख्येने महिला,युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती.यावेळी जनतेने एकच निर्धार केला असून शेतकर्याच्या मुलाला खासदार करण्यासाठी ग्रामिण भागातून जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हेच अंबाजोगाई येथील प्रचार सभेतून दिसून आले.