सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― तालुक्यात शुक्रवार रोजी मध्यरात्री आलेल्या चक्री वादळा मुळे सोयगाव शहरासह तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले होते तर कंकराळा येथे घरात पाणी शिरल्याने काहीचे संसार उघड्यावर आले होते , कंकराळा येथील चक्री वादळामुळे घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याची नुकसान झाली होती तसेच घरातील वस्तू पाण्यात वाहून गेल्याने येथील नुकसान ग्रस्त ग्रामस्थांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते किराणा सामान , धान्याची व जिवनाश्यक भाड्यांची मदत करण्यात आली यावेळी कंकराळा येथील सरपंच चंदाताई राजपूत, शिवदास राजपूत,कुणाल राजपूत, दिलीप मचे , सागर राजपुत , गणेश मचे उपस्थित होते…चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवार रोजी केली व झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे महसूल अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या इतर समस्याही जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यात येईल असे यावेळी शेतकऱ्यांना सांगितले
, यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील,सोयगाव तहसीलदार प्रवीण पांडे, गट विकास अधिकारी सुदर्शन तुपे, कृषी अधिकारी ए.जि.टाकणकर, बांधकाम विभागाचे अभियंता कल्याण भोसले ,पोलीस सहाय्यक निरीक्षक सुदाम सिरसाट यांच्या सह युवासेना नेते अब्दुल समीर, आबा काळे,राजू राठोड, कुणाल राजपुत ,समाधान तायडे,श्रीराम चौधरी,दिलीप देसाई , हे उपस्थित होते.
0