लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे बोरखेड येथिल ग्रामस्थांना पाण्यासाठी पहाटे पासूनच हंडे घेऊन रांगा लावाव्या लागतात तर एक आठवड्यानंतर लाईट रात्री असल्यामुळे व रात्री १२ वा. पाणी येत असल्याने रात्र जागून पाणी भरावे लागते.
सुशिलाबाई बोराडे :
पाणीच भेटत नाही, नळाला आलं तरी बारीक धार चलते. पाणी पुरवठा योजनेच्या नळाला महीना-महिना पाणी येत नाही. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना विचारलं तर बघु बघुच म्हणतेत.
ऋतुजा क्षीरसागर :
मी १० वी शिकत आहे, पाणी भेटतच नाही, मला पाणी आणावे लागते, जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला पाणी नळाव्दारे घरपोच द्यावे.
रेतीक क्षीरसागर :
मी ४थी पास होऊन ५ वी ला गेलोय. माझ्याकडे सायकलवरून हंडे आणुन नंबरला लावायचे काम आहे, पप्पा नंतर सायकलवर पाणी घरी आणतात.
पार्थ केमकर :
विहीरीतुन पाणीपुरवठा होत असलेल्या पाइपलाइनच्या एअरवाल मधुन या नळाला पाणी येतं,.मला सायकल वरुन पाणी आणावं लागतं. आठवड्याआड लाईट रात्री १२ वा.आली तर आई आणि वडील रात्र जागून पाणी भरतात.आम्हाला कलेक्टर साहेबांनी घरोघरी नळयोजने मार्फत पाणीपुरवठा करावा.
ग्रामसेवक वाघ : मो.नं.९४२१३५१०१६
पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे, खाजगी ४ बोअरवेल अधिग्रहण केले आहेत, टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीला सादर केला आहे. आठ दिवसांपूर्वी तहसिलदार साहेब येऊन पाहणी करून गेलेत.त्यांनी पुढिल कारवाई करण्यात येईल.
सरपंच विलास गावडे :मो.नं.९७६७८४१०४९
गावातील ४ बोअरवेल अधिग्रहण केले आहेत, टँकर प्रस्ताव पंचायत समितीला सादर केला आहे, सध्या गोलंग्री तलावातील पाणी पुरवठा योजना आहे, वाढवणा तलावातील पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे, सरकार बदलले आणि कोरोना सुरू झाला.. पाणी टंचाई निर्माण झाली आहे ही गोष्ट मात्र खरी आहे.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड मो.९४२००२७५७६
बोरखेड येथिल तिव्र पाणीटंचाई निर्माण प्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अध्यक्ष जिल्हा परिषद बीड मार्फत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन दिले आहे.