बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे – संजय वाघमारे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रातील पत्रकारांच्या वेतन व नौकरी विषयक समस्या सोडवून त्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन व आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक संजय बालासाहेब वाघमारे यांनी शनिवार,दिनांक 18 जुलै 2020 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,केंद्रीय पर्यावरण,माहिती आणि दूरसंचार मंत्री प्रकाशजी जावडेकर तसेच राज्य माहीती व जनसंपर्क विभागाचे सचिव यांना पाठवलेल्या मेलद्वारे केली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक संजय बालासाहेब वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आज सरकार कोरोना (COVID-19) संसर्गजन्य आजाराला हरविण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे.महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनच्या काळात कुणीही अन्नधान्यापासून उपाशी राहु नये याची काळजी घेवून त्यासोबतच तत्पर आरोग्य सुविधा पुरविली जात आहे.याबाबत काळजी घेत राज्यामध्ये शासनासोबत,सामाजिक संस्था,विविध संघटना कार्यरत आहेत.या संकटाच्या काळात आपले काय होईल याची तमा न बाळगता अहोराञ काम करणा-या पत्रकारांना राज्यातील काही मोठ्या वृतपत्र समूहाने पत्रकारांचे पगार देण्यास पैसेच नसल्यामुळे चक्क कामावरून कमी करण्यात आलेले आहे.सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणा-या पत्रकारांना, आपल्या कर्मचा-यांना माध्यम संस्थाच कामावरून काढत आहेत.अनेक वर्षे या कर्मचा-यांनी अशा माध्यम संस्थांच्या भरभराटीसाठी काम केलेले आहे.मोठ्या माध्यम समुहासाठी काम करणा-या जिल्हा,तालुकास्तरावरील काही पत्रकारांना थोडे फार मानधन दिले जाते.मात्र जिल्हास्तरीय वृत्तपत्रांसाठी काम करणा-या ग्रामीण भागातील पत्रकारांना मानधन किंवा साधा पगार ही मिळत नाही.जाहीरात प्रसिध्दीतून मिळणा-या मानधनावर पत्रकारांच्या कुटुंबियांची गुजराण होते.पत्रकारांच्या
मुलांचे शिक्षण,आरोग्य विषयक सुविधा यावरील पत्रकारांचा मोठा खर्च होत आहे.महाराष्ट्रात केवळ अधिस्विकृतीधारक पत्रकार बांधवांना सर्व शासकीय सोयी,सुविधा मिळतात.त्याच प्रमाणे तालुका व ग्रामीण पञकारांना सर्व शासकीय सोयी,सुविधा मिळाव्यात.ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी.तसेच तरूण पत्रकारांना स्वउद्योगासाठी एखादे महामंडळ स्थापन करून कर्जपुरवठा करण्यात यावा.असंख्य पत्रकारांना तर उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.नौकरी गेल्याने अनेक पत्रकारांना कोरोनाच्या काळात दुसरीकडे कुठे नौकरी मिळवायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकारिता हे क्षेत्र आज कमकुवत होत असेल तर देशाचे उद्याचे भविष्य चांगले असणार नाही.त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सामाजिक जाणिवेतून पत्रकार यांना न्याय देण्याचे काम आपण करावे अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक संजय वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *