बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

चक्रीवादळामुळे देवळा,अकोला व तडोळा येथील ऊस भुईसपाट ,ऊसासह विविध पिकांना फटका ; शिवार पाहणी दौरा करून नुकसानीचे पंचनामे

अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यात गुरूवारी दुपारी साडे चार वाजता झालेल्या जोरदार वा-याचे रूपांतर चक्रीवादळात झाले.पाऊस आणि चक्रीवादळामुळे देवळा,अकोला व तडोळा येथील ऊस आणि सोयाबीन सह इतर सर्व पिके ही भुईसपाट झाली आहेत.ऊसासह विविध पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.नुकसानग्रस्त शिवारांची प्रत्यक्ष शिवार पाहणी दौरा करून तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

रविवार,दिनांक 6 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा परीषदेचे सदस्य राजेसाहेब देशमुख यांचेसह तालुका कृषी अधिकारी ठाकूर, तहसिलदार यांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी ए.एन. शेख,कृषी विस्तार अधिकारी आर.डी.बर्वे,सुपरवायझर ढाकणे,कापसे, कृषी सहाय्यक मागाडे,तलाठी हिबाणे,तलाठी रानमारे,सरपंच नानासाहेब यादव, श्रीनिवास आगळे, गुणवंतराव आगळे, राजेभाऊ आगळे, अशोक शितोळे,प्रसाद पवार,शरदबापू पवार आदींनी देवळा, अकोला आणि तडोळ्यातील प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला.

शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी-जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांची मागणी

देवळा,अकोला आणि तडोळा ही तीन गावे मागील दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहेत.असे असताना यावर्षी सुगीचे पीक चांगले आले होते.परंतु,त्यात ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर मोठे संकट या चक्रिवादळाचे निमित्ताने ओढवल्याने शेतक-यांचे कधीही न भरून येणारे एवढे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीची टक्केवारी तब्बल 70 ते 80 टक्के एवढी आहे. त्याप्रमाणेच नुकसानीचे पंचनामे झाले आहेत या दोन तीन गावात चक्रीवादळामुळे हाती आलेले शेती उत्पादन नष्ट झाले आहे.ऊस भुईसपाट झाला आहे. तसेच सध्या साखर कारखाने सुरू नसल्याने सदर ऊस कुठेही विक्रीस देता येत नाही.साखर कारखाने सुरू होण्यासाठी अद्यापही दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आहे.अशा वेळी या भागातील शेतक-यांना शासनाने अकस्मात निधीतून तात्काळ मदत करावी.पिकांची नुकसान भरपाई द्यावी.सर्व अधिकारी यांचेसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी दौरा केला. रितसर पंचनामे केले आहेत.दोन ते तीन दिवसांत अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला जाईल.सरकारने मदत केल्याशिवाय येथील शेतकरी बांधव हे सावरणार नाहीत. त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी देवळा, अकोला व तडोळा येथील शेतक-यांच्या वतीने चक्रीवादळामुळे ऊस भुईसपाट झालेल्या शेतक-यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *