पाटोदा:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन, ऊडीद, मुग कापुस या पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन या पावसाच्या तडाख्यामुळे खरीपांच्या पिकांचा हातातोंडाशी आलेला घास शेतकर्यांच्या तोंडातुन निघुण गेल्यासारखी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवाल दिल झाला असुन यामुळे आज भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ लोकनेत्या पंकजाताई मुंडे ,खासदार डॉ प्रितमताई मुंडे ,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पाटोदा यांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुधीर घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे नेते बाळासाहेब पवार भाजपचे युवा नेते पारगाव गण प्रमुख शामजी हुले, सरपंच संतोषजी नेहरकर भाजपचे युवा नेते संपत नागरगोजे उपसरपंच प्रवीण देवडे यांनी लेखी निवेदन नायब तहसीलदार टाक साहेब यांना देऊन वरील मागण्यांची तात्काळ दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे संबंधित गावातील सज्जाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना आदेशीत करून याचा अहवाल जिल्हाधिकारी बीड यांना सादर करण्यात यावा तसेच पाटोदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित असुन शेतकरी बँकेत हेलपाटे मारुन मारून वैतागले असुन मुजोर बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना ऊडवा ऊडवीची ऊत्तरे देत असुन शेतकऱ्यांची अवहेलना करत आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे तरी याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी आठ दिवसांत प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत नसता बँकेसमोर आपण उपोषणाला बसणार असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुधीर घुमरे यांनी दिला आहे यावेळी संजय गव्हाणे, जितेंद्र कदम, संदीप गरकळ, मुकुंदा बडे, दत्ता सातपुते आदी उपस्थित होते.