अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकांविरोधात आज काँग्रेस राबविणार ‘स्पीक अप फॉर फार्मर्स‘ ही ऑनलाईन मोहिम

जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे-राजकिशोर मोदी यांचे आवाहन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘स्पीक अप फॉर फार्मर्स‘ ही ऑनलाईन मोहिम आज शनिवार,दि.26 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासुन राबविण्यात येणार आहे.या मोहिमेतर्गंत बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारने जी विधेयके आणली.ती मागे घ्यावीत अशी मागणी करणारे व्हिडीओ,फोटो,संदेश हे सोशल मिडीयावर म्हणजेच फेसबुक,ट्विटर, इन्टाग्राम,युट्युब यावर पोस्ट करायच्या आहेत.या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होवून आपला आवाज बुलंद करू व या संघर्षात शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आवाहन करत तरी या मोहिमेत बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल, ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष हे सहभागी होणार आहेत.या मोहिमेतून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयका विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी या बाबत बोलताना नमुद केले आहे की,वतीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयका विरूद्ध 24 सप्टेंबर पासुन देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याचाच एक भाग म्हणून आज शनिवार,दि.26 सप्टेंबर रोजी ‘स्पीक अप फॉर फार्मर्स‘ ही ऑनलाईन मोहिम राबविण्यात येणार आहे.भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन विधयके संसदेत मंजूर करून घेतली असून या नवीन काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.या विधेयकांच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यांवर येऊन याला तीव्र विरोध करत असताना हे निर्दयी सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीमार करत आहे.या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते संसदेसह कोणाशीही चर्चा वा संवाद न साधताच गरिब शेतक-यांवर हा कायदा लादत आहे हे अन्याय कारक आहे.या पार्श्‍वभूमीवरच काँग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,प्रभारी यांच्या समवेत एक विशेष बैठक 21 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत शेतकरी विरोधी विधयके व त्याविरोधात संघर्ष करणा-या शेतक-यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 24 सप्टेंबर पासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या आंदोलनाचे स्वरुप म्हणजे ऑनलाईन मोहीम होय.भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकांना विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवार,दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदवायचा आहे.तरी या मोहिमेत बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button