आष्टी तालुक्यातील किन्ही गावच्या त्या बारा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

आष्टी दि.२७:अशोक गर्जे―
आष्टी तालुक्यातील किन्ही येथे बारा वर्षीय मुलगा दिवाळीनिमित्त आपल्या आजीकडे पाहुणा म्हणून आला होता होता.आज दुपारी साडे अकराच्या सुमारास मुलाला नरभक्षक बिबट्याने उचलून नेले. गावातील नागरिकांनी मुलाचा शोध घेतला असता बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरल्याचे कळाले. सदरील घटना अत्यंत दुर्देंवी आहे.त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच बिबट्याचा शोध घेणे गरजेचे असून नागरिकांनी आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतकऱ्यांनी ,शेतमजुरांनी एकटे न राहता समुहाने काम करावे. सायंकाळी लवकर शेतामधुन घरी परतावे. रात्री घराबाहेर झोपु नये. लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी.