बीड जिल्हाबीड शहर

बीड जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करा ,अतिरिक्त रोहित्र व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्या -जयदत्त क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगामात शेतकरी पिकांना पाणी देण्याच्या कामात आहेत मात्र लोडशेडिंगमुळे दिवसा वीज पुरवठा बंद केला जातो तसेच अनेक ठिकाणी जनित्र खराब झाले आहेत त्यामुळे त्याची दुरुस्ती आवश्यक आहे यासाठी बीड जिल्ह्या अतिरिक्त रोहित्र देऊन दुरुस्ती देखभालसाठी अतिरिक्त निधीची गरज आहे सध्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे दिवसाची लोडशेडिंग बंद करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ठाकरे,ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या शेतकर्यांचे रब्बी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी देणे चालू आहे वीज पुरवठा कमी दाबाने व खंडित होत असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे सध्या शेतात गह ज्वारी हरभरा ही पिके उभी असून रब्बी हंगाम पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे पिके धोक्यात येऊ लागले आहेत जिल्ह्यात ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे आठ तास वीज पुरवठा होत आहे तसेच रात्रीचा वीजपुरवठा होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना पिकास पाणी देताना जंगली जनावरे,सर्प विंचू, श्वापदे यापासून धोका होऊ लागला आहे. मराठवाड्यात व बीड सध्या शेतकर्यांचे रब्बी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी देणे चालू आहे वीज पुरवठा कमी दाबाने व खंडित होत असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे सध्या शेतात गह ज्वारी हरभरा ही पिके उभी असून रब्बी हंगाम पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे पिके धोक्यात येऊ लागले आहेत जिल्ह्यात ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे आठ तास वीज पुरवठा होत आहे तसेच रात्रीचा वीजपुरवठा होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना पिकास पाणी देताना जंगली जनावरे,सर्प विंचू, श्वापदे यापासून धोका होऊ लागला आहे. मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात त्याने अनेकांचे बळी घेतले आहेत त्यामुळे भेटीचे व दहशतीचे वातावरण आहे याकरता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच शेतीला पाणीपुरवठा चालू असल्याने जनित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे ग्रामीण भागात डीपीची दरुस्ती करणे व पूर्ण क्षमतेच्या डीपी बसवणे आवश्यक आहेत यासाठी अतिरिक्त ट्रांसफार्मर देण्यात यावी व दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मूख्यमंत्री उद्धव ठाकरे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.जिल्ह्यात त्याने अनेकांचे बळी घेतले आहेत त्यामुळे भेटीचे व दहशतीचे वातावरण आहे याकरता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच शेतीला पाणीपुरवठा चालू असल्याने रोहीत्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे ग्रामीण भागात डीपीची दरुस्ती करणे व पूर्ण क्षमतेच्या डीपी बसवणे आवश्यक आहेत यासाठी अतिरिक्त ट्रांसफार्मर देण्यात यावी व दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मख्यमंत्री उद्धव ठाकरे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button