अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जीपॅट व एनआयपीईआर-२०२१ या राष्ट्रीय परीक्षेत घवघवीत यश

अंबाजोगाई (वार्ताहर): श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतात राष्ट्रीय स्तरावर एनटीए मार्फत घेण्यात आलेल्या जीपॅट व एनआयपीईआर परीक्षेत घवघवीत यश संपादन करून अंबाजोगाई आणि महाविद्यालयाचे नांव उंचावले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाची स्थापना सन २०१० साली मोदी लर्निंग सेंटर,रिंग रोड, अंबाजोगाई या ठिकाणी करण्यात आली.अंबाजोगाई हि शिक्षणाची पंढरी म्हणुन सर्वदूर प्रसिध्द आहेच परंतु,अंबाजोगाई मध्ये विद्यार्थ्यांना मेडीकल आणि इंजिनिअरींग या क्षेत्रापेक्षा वेगळे क्षेत्र परीचीत नव्हते आणि हिच गरज ओळखून या मंडळाचे सचिव राजकिशोर मोदी यांनी औषध निर्माणशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर आणि औषधनिर्माण शास्त्राचा डिप्लोमा कोर्स हा सर्व सोयी सुविधांची उपलब्धता करून दिले आहेत.या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळेत औषध निर्माण करण्याच्या सर्व सोयी,सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांना तज्ञ प्राध्यापकांमार्फत लेखी तसेच प्रात्यक्षिकांमधून उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येते.आज विद्यार्थी १२ वी नंतर फक्त मेडीकल आणि इंजिनिअरींग कडेच वळतो.परंतू,या दोन क्षेत्रापेक्षाही अनेक क्षेत्र आहेत.ज्यामध्ये विद्यार्थी आपले करीअर घडवू शकतो.याचा प्रत्यय देणारे उदाहरण म्हणजे या महाविद्यालयातील ८ विद्यार्थी सर्वोत्तम गुण घेवुन उत्तीर्ण झाले आहेत.सदरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एम.फार्मसी या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्याला दरमहा १२०००/- रूपये विद्यावेतन मिळते.या परीक्षा मध्ये कु.गितांजली शेवाळे हिने २४५ गुण संपादन करून भारतात २४१ वा क्रमांक मिळविला आहे.तसेच अनुसया सौंदणकर हिने २०७० वा सलोनी मुथा हिने १८५१ वा कु.स्वाती गुंजकर हिने २०७० वा अंजली माचवे हिने २३२३ वा तर दिनेश राऊत याने ३४६९ तसेच जिनीषा डागा हिने ३४६९ आणि धनश्री मुंदडा हिने २५४० वा क्रमांक मिळविलेले आहे.तसेच एनआयपीईआर-२०२१ या परीक्षेमध्ये अंजली माचवे हिने संपूर्ण भारतात ८५० वा अनुसया सौंदणकर हीने १०४८ वा सलोनी मुथा हिने १४३४ वा आणि दिनेश राऊत याने २२८८ वा क्रमांक प्राप्त केला आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी हे सिध्द केले.की,मनात जिद्द असली की कुठल्याही शाखेत तितकेच यश प्राप्त करता येते.त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या उच्च शिक्षणासाठी विविध पर्यायांचा नक्की विचार करायला हवा आहे.आजच्या स्पर्धेच्या युगात आता आयुष्याभरासाठी नोकरी मिळणे हे २१ व्या शतकामध्ये कमी होणार आहे.हा विचार मनात ठेवून कौशल्य अभ्यासक्रम आत्मसात करावा.संस्थेतर्फे बी-फार्मसी,एम-फार्मसी,डी-फार्मसी हे अभ्यासक्रम (कोर्सेस) शिकविले जातात.विद्यार्थ्यांच्या यशामध्ये प्राचार्य कृष्णा झांबरे,प्राचार्य डॉ.संतोष तरके,प्रा.नरेशकुमार जैस्वाल,मंजुषा केरप्पा आणि इतर सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी,प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी प्रा.वसंतराव चव्हाण, डॉ.डी.एच.थोरात,संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी,कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button