अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

शिक्षिका वर्षाताई मुंडे लिखित “बालमन फुलवताना” पुस्तकाचे प्रकाशन

भाशिप्रचा शिक्षक लेखक होतो त्याचा मोठा आनंद – कार्यवाह नितीन शेटे

अंबाजोगाई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत काम करणारा शिक्षक स्वत: अंतःर्मुख होवुन जेव्हा आपल्या ज्ञानाचे प्रगटीकरण करतो आणि पुस्तकाच्या माध्यमातून आलेले अनुभव समाजासमोर मांडतो अशा शिक्षक लेखकाचा संस्थेला सार्थ अभिमान असून अशा शिक्षकांच्या पाठीशी संस्था उभी आहे व प्रोत्साहनच देते,शिक्षिका सौ.वर्षाताईने लिहिलेलं पुस्तक वर्तमान युगात बालक,पालक आणि शिक्षक यांच्यातील संवादाचे प्रकटीकरण आणि भविष्याच्या व्यक्तिमत्वाचे सदृढीकरण असल्याचे प्रतिपादन भाशिप्र संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांनी केले.

येथील खोलेश्वर प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका सौ.वर्षाताई विजय कराड यांनी लिहिलेल्या “बालमन फुलवताना” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात संपन्न झाला.त्याप्रसंगी भाशिप्र संस्थेचे कार्यवाह शेटे हे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष ॲड.किशोर गिरवलकर हे होते.तर विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्थान राष्ट्रीय मंत्री देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ.मधुश्री संजय सावजी यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच यावेळेस कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर,प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे,मुख्याध्यापक आप्पाराव यादव,लेखिका वर्षाताई मुंडे आदींची उपस्थिती होती.व्यासपीठावरील मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर सर्वांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ.अतुल देशपांडे यांनी संस्थेतील शिक्षिकांनी लिहिलेल्या पुस्तकाचे जाहिर स्वागत करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी बोलताना बिपीनदादा क्षीरसागर यांनी पुस्तकाच्या आशय व विषय निवडीचे कौतुक करून वर्तमान काळात अशा लेखकांची समाजाला नितांत गरज असल्याचे सांगितले.तर डॉ.मधुश्री सावजी यांनी पुस्तकाचे विमोचन करताना लहान मुलांच्या सोबत एकरूप होवुन शिक्षकाने त्याचे केलेले पालकत्व हे भावी आयुष्याच्या उद्धारासाठी किती महत्वाचं असते ? हे सांगताना अनेक मौलिक उदाहरणे दिली.वर्षाताई यांचे कौतुक करताना त्यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख आवर्जुन त्यांनी केला.आपल्या भाषणात सुरूवातीलाच बोलताना कार्यवाह नितीन शेटे म्हणाले की,संस्थेमध्ये अशा प्रकारे लेखक तयार व्हावेत,यासाठी त्यांना आमच्याकडून नेहमीच प्रोत्साहनपर ताकद देण्यात येते.या पुस्तकाच्या ५०० प्रती संस्था घेणार असल्याचे त्यांनी यावेळेस जाहीर केले.आपल्या संस्थेचा संस्कार अंगीकृत करून जबाबदारी आणि कर्तव्याचे पालन करणे हाच मुळ उद्देश असल्याचं सांगून त्यांनी भाशिप्र संस्थेत इतरही अनेक शिक्षक,प्राध्यापक,प्राचार्य हे साहित्यिक आणि लेखक असल्याचे गौरवपूर्ण शब्दांत मान्यवरांच्या समोर नमूद केले.याप्रसंगी आप्पाराव यादव यांनी ही मनोगत व्यक्त केले.त्यानंतर लेखिका वर्षाताई मुंडे यांनी कृतज्ञता भाव व्यक्त केला.वर्षाताई यांनी आपल्या मनोगतात आपल्याला शिक्षक म्हणून आलेले काही अनुभव संचित करून लिखित स्वरूपात ते समाजासमोर आणण्याचा हा छोटा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.सावजी ताईंनी शिक्षण क्षेत्रात कसे योगदान द्यावे आणि शुद्ध कर्मातून आनंद कसा मिळवता येतो ? अगदी मार्गदर्शनपर वैचारिक भाषण केले.शिवाय पुस्तकाच्या पृष्ठभागावरील काल्पनिक चित्र आणि त्यातून घेता येणारा अर्थ म्हणजेच लहान मुलं आई-वडिलांचं बोट धरून जेव्हा योग्य दिशेने जातो आणि एक चित्र असं ज्या मुलाला वडील आकाशात भरारी घेण्यासाठी पंखात बळ भरतात याचे त्यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल बोधले यांनी केले तर उपस्थितांचे आभार काळे मॅडम यांनी मानले.या कार्यक्रमाला राम कुलकर्णी,खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,लक्ष्मणराव मुंडे,सौ.गवळणबाई मुंडे आदी मान्यवरांसह शिक्षकांची उपस्थिती होती.


Back to top button