कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल येथील अमोल दहातोंडे या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने आपल्या वाढदिवस साजरा न करता आपल्या समाज बांधवांनवर नैसर्गिक आपत्ती आली असून त्यामध्ये आपला खारीचा वाटा म्हणून दहातोंडे याने पूरग्रस्तांसाठी मदत केली
गेल्या आठवड्यात कोकण विभागातील रायगड ,रत्नागिरी,सिंधुदुर्ग ,जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे शेकडे लहान मोठी वयोवृद्ध माणूस बेघर झाली. मात्र या काळात सामाजिक बांधिलकी जपत अमोल दहातोंडे या तरुणांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत पूरग्रस्तांना पार्ले बिस्कीटचे बॉक्स पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून या तरुणाने मदत केली.