औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

शेतकऱ्यांना खरीप पिककर्ज तत्काळ उपलब्ध करून द्या―जन क्रांती संघाचे संस्थापक डॉ संदीप घुगरेंची मागणी

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे शेतमाल विक्रीसाठी बाजार पेठ उपलब्ध नाही आता सुरू होतील अशी अपेक्षा आहे त्यातही प्रथम नोंदणी करा नंतर आपला नंबर लागेल त्यानंतर माल विकला जाईल व नंतर पेमेंट अदा केले जाईल या सर्व प्रक्रियेत शेतकरी भरडला जाणार आहे त्यातच शेतीच्या मशागतीकरिता मोठा खर्च लागतो अशातच हवामान खात्याने या वर्षी लवकर पाऊसा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात च पेरणी ला सुरुवात करतील असा अंदाज आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस खते बी बियाणे ची सोय लावावी लागते मागील वर्षी अतिवृष्टीमुळे व यावर्षीही अतिवृष्टी काही प्रमाणात दुष्काळ व कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे द्राक्षे,मोसंबी, आंबे, कापूस, टरबूज, टमाटे, कांदे ही पिके मार्केट पर्यंत विकण्यासाठी गेली नाही.

त्यामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. त्यातच मागील सरकारच्या काळात अनेक अटी घालून झालेल्या कर्जमाफी मूळे अनेक शेतकरी कर्जमाफीत वंचित राहिले. थकीत परंतु आताच्या कर्जमाफी मध्ये अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अनेक शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाली अशा शेतकऱ्यांना तसेच चालू कर्जदार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे जेणेकरून ह्या अचानक कोरोना च्या उद्भवलेल्या संकटामुळे तसेच आधीच आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

शेतकरी कर्जवाटपाच्या प्रतीक्षेत आहे आपण तत्काळ चालू कर्जदार व कर्जमाफी त बसलेल्या शेतकर्यांना तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जन क्रांती संघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप घुगरे, अंबड तालुका संघटक किरण लिंगायत, धनगर समाज क्रांती मोर्चा चे शिवाजी नेमाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषि मंत्री दादा भुसे,ग्रामविकास मंत्री यांना ई-मेल मार्फत निवेदन दिले आहे.


Back to top button