पाटोदा: येथील आंबेडकर चौकात झालेले अतिक्रमण प्रशासकीय यंत्रणा काढत नसल्याने, याबाबतचा खुलासा प्रशासनाने द्यावा, अन्यथा १६ जून रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाटोदा शहरातील आंबेडकर चौकात काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत पाटोदा पोस्ट ऑफिस कार्यालयाने १५ एप्रिल रोजी संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबतचे पत्र दिले होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटोदा यांनी देखील याबाबत पत्र दिले आहे. तरी देखील प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे प्रशासकीय यंत्रणा कुणाच्या दबावाखाली अतिक्रमण काढत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास १६ जून रोजी आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे पाटोदा शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय अधिकारी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.”
0