बीड तालुकाब्रेकिंग न्युज

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात ‘भारत बंद’ला लिंबागणेशकरांचा पाठिंबा: डॉ. गणेश ढवळे

बीड, ९ जुलै (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि भांडवलदारधार्जिण्या धोरणांच्या निषेधार्थ आज, बुधवार, ९ जुलै रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामस्थांनी जोरदार पाठिंबा दर्शवला. १० केंद्रीय कामगार संघटनांनी विविध शेतकरी आणि ग्रामीण कामगार संघटनांच्या समन्वयाने पुकारलेल्या या देशव्यापी संपाला प्रतिसाद देत, लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांनी तीव्र निदर्शने केली.

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी

लिंबागणेश येथील मुख्य प्रवेशद्वारावर जमलेल्या आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, “कामगार एकजुटीचा विजय असो”, “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ, ॲड. गणेश वाणीविक्रांत वाणी, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळदामोदर थोरातरमेश गायकवाडअशोक जाधवपांडुरंग वाणीसुरेश निर्मळभालचंद्र गिरेआश्रुबा गिरेसतीश वायभटसंजय घोलपचिंतामण ढासगणपत घोलपबालाजी निर्मळसय्यद अख्तरसंजय पावलेजनार्दन भोसलेअंकुश गायकवाडज्ञानोबा निर्मळबाजीराव दशमेशेषेराव तागडहरिभाऊ कदमबाळू सोनावणेचोखोबा निर्मळजनार्दन वाणीसर्जेराव घरतबाबासाहेब वायभटभास्कर वाणी आदींसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब राखगोविंद बडे, पो. ह. सतीश राऊत आणि सुदाम शेलार हे पोलिस अधिकारी उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्या आणि कामगारांच्या हक्कांवर गदा: डॉ. गणेश ढवळे

यावेळी बोलताना डॉ. गणेश ढवळे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “केंद्र सरकारच्या कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग) कायदाआवश्यक वस्तू कायदाजमीन अधिग्रहण कायदा यांसारख्या शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे, कामगार संघटनांनी संसदेने मंजूर केलेल्या ४ कामगार संहितांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होत असून कामगार संघटनांची ताकद कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.”

डॉ. ढवळे यांनी पुढे असेही नमूद केले की, “केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिण्या धोरणांविरोधात लिंबागणेशकरांमध्ये तीव्र संताप असून, या विरोधात निदर्शने करत ‘भारत बंद’ला पूर्ण समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button