प्रशासकीयब्रेकिंग न्युज

भारतीय संविधानाचा ७५ वर्षांचा प्रवास अभिमानास्पद- मंत्री ॲड.आशिष शेलार

आठवडा विशेष टीम―




मुंबई, दि. २६ : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया भारतीय संविधानाने घातला. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची खात्री आणि समान अधिकार संविधानाने मिळवून दिले. भारतीय संविधानाचा ७५ वर्षांचा हा प्रवास अभिमानास्पद असून यापुढेही असेच मार्गक्रमण करीत आपण लोकशाही बळकट करू, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत केले.

भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर विधान परिषदेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री ॲड शेलार यांनी संविधानाची महती आणि त्याचे महत्व अधोरेखित केले

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, ३७० कलम हटविण्याच्या ऐतिहासिक घटनेमुळे जम्मू – काश्मीर देशाच्या घटनात्मक प्रवाहात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे देशाच्या एकात्मतेला बळकटी मिळाल्याचे मत सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

0000







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button