राजकारणसंपादकीय

…तर होतील पंकजाताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ?

गोपीनाथ मुंडे नाव घेतलं की शरद पवार व त्यांची राष्ट्रवादी समोर आलीच अस एक समिकरण आजवर आपण पाहिलं आहे आणि आज पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे सरकार असून मुख्यमंत्री मात्र संघर्ष यात्रेत पंकजाताई मुंडे यांच्या सोबत असणारे देवेंद्र फडणवीस. यावर विचार केला तर जनतेच्या मनात होतच पंकजाताई मुख्यमंत्री होतील…म्हणून जनतेने आपल्या मतांचा कौल भाजपाच्या दिशेने वळवला.मात्र पंकजा मुंडे काय मुख्यमंत्री झाल्या नाही…त्यांची कॅबिनेट मंत्रीमंडळात निवड करण्यात आली.मुख्यमंत्री मात्र फडणवीस झाले.मराठवाडा मुख्यत्वे बीड आणि नगर जिल्ह्यातील गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या वर्गाला मात्र वाटायचे मुख्यमंत्री ताईच होणार मात्र भाजपने वेगळंच केलं कारणाने पंकजा मुंडे समर्थक गट मात्र चिडला बऱ्याच दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले म्हणणे समर्थक सोशल मिडियावर मांडत राहिले.
परंतु जर २०१९ च्या निवडणुकित विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले ?तर मात्र भाजपा पंकजाताई मुंडे यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी विचार करेल ?आणि बीड जिल्ह्यातील जनतेचे राहिलेलं अधुर स्वप्न पूर्ण होईल.आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून मा.ना.पंकजाताई मुंडे यांचे नाव कोरले जाईल.
भारतीय जनता पार्टी गाव-तांड्या पर्यंत नेण्याचे कार्य स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी पूर्ण केल होत.ज्या भाजपाला बीड जिल्ह्यात पूर्वी कोणी ओळखत नव्हते त्या भाजपाचे बीड जिल्ह्यात आज पाच आमदार हे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने निवडून आले.एवढे महान कार्य करणारा नेता बीड जिल्ह्याला लाभला ही जिल्ह्यातील जनतेसाठी आनंदाची गोष्ट आहे.

बहुचर्चित असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला एकीकडे उमेदवार मिळत नाही तर दुसरीकडे पंकजाताईंचे प्रत्येक मतदारसंघात जनता जल्लोषात स्वागत करत आहे त्यामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी मध्ये सर्वात जास्त लोकप्रियता असणारा मंत्री पाहिला तर ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे पाहिले जाते.जनतेच्या मनातील मुख्यमंत्री खरोखरच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री होतील यात काही शंका नाही.बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून पंकजाताईंनी जिल्ह्यात केलेल्या सर्वांगीण विकासकामांचे थाटात लोकार्पण सोहळे पार पडत आहेत जिल्ह्यातील जनता संपूर्ण ताकतीने पंकजाताई मुंडे यांच्या सह भाजपाच्या पाठीशी राहील.
परळीच नव्हे तर इकडे आष्टी आणि गेवराई पर्यंत पंकजाताई गोपीनाथराव मुंडे जनतेच्या मनात आहेत.
ताईंचे नेतृत्व एवढ्यावरच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात ताईंचे चाहते ताई कधी मुख्यमंत्री होतील याची वाट पाहत आहेत..!

2 Comments

  1. मी वंशवादाचा स्पष्ट विरोधक आहे त्यामुळे कोणाला राग आला तरी चालेल,पण पंकजा नको

  2. कुणिहि का होईना पण मराठवाड्यातिलच व्हायला पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button