बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावून घ्यावे – आरक्षण प्रश्नी संभाजी ब्रिगेड आक्रमक ; मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समावून घ्यावे अशा मागणीचे निवेदन सोमवार,दिनांक 14 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांना अप्पर जिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांचे मार्फत देवून आरक्षण प्रश्नी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.राज्य मंञी मंडळातील मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा दिला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडण्यास राज्यसरकार अपयशी ठरले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संभाजी ब्रिगेड व अनेक मराठा संघटनांनी अंदोलने व उपोषणे केली. अंदोलना दरम्यान मराठा युवक काकासाहेब शिंदे या तरूणाने आरक्षण मिळावे यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.(तसेच अनेक तरूणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या.) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रक्रिया चालू होती पण,महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत.मागील सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जे वकील देण्यात आले होते.आघाडी सरकार मध्ये त्यांना बदलण्यात आले.आघाडी सरकार मराठा समाजावर अन्याय करीत आहे.खरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात प्रक्रिया सुरू असताना सरकारने लक्ष देण्याची गरज होती.पण,एका नटीच्या वादग्रस्त बोलण्याकडे सरकारने जास्त प्रमाणात लक्ष दिले.राज्य मंत्रीमंडळा मध्ये अनेक मराठा आमदार असून ही एकही मराठा आमदार,मंत्री मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करीत नाही.म्हणून येणा-या काळात संभाजी ब्रिगेड एकाही मराठा मंत्र्याला व राज्य
सरकारातील एकाही मंत्र्याला जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही.आरक्षण निर्णय होईपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नये,लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुन:श्च राज्य सरकारने प्रयत्न करावेत अन्यथा याप्रश्नी संभाजी ब्रिगेड तर्फे तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे,माजी जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,धर्मराज सोळंके,अरूण गंगणे,लहू शिंदे, माणिकराव लाडेकर, सुरज शिंदे,गणेश क्षीरसागर,विशाल माने,सत्यप्रेम इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *