बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

जीवनावश्यक मागण्यांसाठी फकीरा ब्रिगेडचे निवेदन ,जिल्हाध्यक्ष अविनाश साठे यांचा पाठपुरावा

अंबाजोगाई (प्रतिनिधी):
महाराष्ट्रातील बांधकाम कामगार व मजूरांना पेन्शन योजना लागू करा,केशरी रेशनकार्ड धारकांना आरोग्य सेवेच्या लाभांमध्ये सामील करून कायमस्वरूपी धान्य पुरवठा करा आणि रमाई आवास योजनेतील घरकुलासाठी मालकीच्या जागेची अट शिथील करा या प्रमुख व जीवनावश्यक मागण्यांची राज्य सरकारने पुर्तता करावी यासाठी फकीरा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अविनाश बन्सी साठे यांनी मुंबईत जावून संबंधित खात्यांच्या मंञी महोदयांच्या कार्यालयास भेट दिली.जबाबदार अधिकारी यांचेशी याविषयी चर्चा करून सदरील मागण्यांचे निवेदन दिले.

फकीरा ब्रिगेड ही सामाजिक बांधिलकी मानून काम करणारी संघटना आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीडचे जिल्हाध्यक्ष अविनाश बन्सी साठे हे तळमळीने आणि प्रभावीपणे संघटनेचे काम करीत आहेत. साठे यांनी मुंबईत जावून फकीरा ब्रिगेडच्या वतीने कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यात बांधकाम कामगार व मजूरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून 50 वर्षांच्या पुढील कामगारांना मासिक रूपये 2000/- पेन्शन लागू करावी तसेच 50 वर्षांच्या पुढील जे मजूर आहेत त्यांना ओझ्याची कामे होत नाहीत.आजारपणात औषधोपचारासाठी त्यांचेकडे प्रसंगी पैसे ही नसतात.त्यांना अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्यामुळे महाराष्ट्रातील बांधकाम कामगार व मजूर यांना पेन्शन योजना लागू करावी.अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगनरावजी भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील बहुतांश केशरी रेशनकार्ड धारक अतिशय गरीब व दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगत असून ते अनेक सवलतीं पासून वंचित आहेत व त्यांचा अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करून घ्यावा.तसेच शैक्षणिक व आरोग्य विभागातील राजीव गांधी आरोग्य,महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करून घ्यावा.या सोबतच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रात दलित समाज हा मोठ्या प्रमाणात असून तो गरिब व दारिद्रय अवस्थेमध्ये जीवन जगत आहे.शहरात
बहुतांश लोक हे झोपडपट्टी मध्येच राहतात.ते भोगवटाधारक आहेत व 40 ते 50 वर्षांपासून या घरामध्ये राहतात.अनेकांनी त्यांच्या घराची नोंद ही महानगरपालिका व नगरपालिकेत अद्यापपर्यंत केलेली नाही.त्यामुळे असे गरिब लोक हे घरकूल योजनेपासून वंचित आहेत.तरी मालकी जागेची जाचक अट रद्द करून भोगवटदार लोकांना घरकूल योजना लागू करावी अशा प्रमुख मागण्या सदरील 3 निवेदनांद्वारे करण्यात आलेल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *