सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पावसाची चिंता लागलेल्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या तावडीतून कपाशी आणि फळबागांची सुटका करण्याचा मोठा प्रश्न पडला असल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत अडकले आहे.दरम्यान अन्नाच्या शोधात शेती शिवारात आलेल्या वन्य प्राण्यांकडून सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांची व फळबागांची नासधूस करण्यात येत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे.ओनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांना मुकाट्याने नुकसान सोसावे लागत असून ओनलाईन अर्ज न केल्याने वनविभागाकडून नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने चिंता वाढली आहे.
सोयगावसह वेताळवाडी, आमखेडा, गलवाडा, कंकराळा ,जरंडी,निंबायती,बहुलखेडा,कवली,घोसला,सावळदबारा,बनोटी आदि भागात वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला असून या वन्यप्राण्यांचं उछादात ठिबक सिंचन लागवड करण्यात आलेल्या कपाशी,भाजीपाला,आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.आधीच पावसाची चिंता असलेल्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारामुळे नुकसानीला कंटाळले असतांना या नुकसानीच्या भरपाईसाठी ओनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया असतांना मार्गदर्शनाअभावी अर्ज ओनलाईन न झाल्याने वनविभागाकडून केवळ पाहणी सुद्धा करण्यात आलेली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.दरम्यान घोसला शिवारात शेतकरी अमोल बोरसे, प्रमोद वाघ ,आबा बावस्कर, किशोर बावस्कर . या शेतकऱ्यांच्या कापूस या पिकांचे नीलगाय या जंगली जनावरांनी मोठे नुकसान केले आहे व जंरडी धिंगापुर शिवारातील दिलीप पाटील यांच्या मोसंबी,पपई बागा वन्यप्राण्यांनी उखडून फेकल्या आहे.वन्यप्राण्यांच्या नुकसानीत नुकत्याच लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांनी कोवळे अंकुर वर काढले असतांना वन्यप्राणी या पिकांवर ताव मारत आहे.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.तातडीने संबंधित विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
0