Offer

मांजरसुंबाच्या विशाल रसाळ यांचा साधेपणाने विवाह संपन्न

चौसाळा दि.३:नानासाहेब डिडुळ― कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये विवाह सोहळा करताना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. तसेच यामध्ये सामाजिक परिस्थितीच्या सर्व गोष्टींचा विचार करून विवाह सोहळा करावा लागत आहे. अनिष्ट सामाजिक चालीरीतींना फाटा देत अगदी साधेपणाने विवाह सोहळा करण्याचा आदर्श बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील रसाळ व कळसंबर येथील वाघमारे परिवाराने घालून दिला आहे.
मांजरसुंबा येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेरमन मोहनराव रसाळ यांचे कनिष्ठ चिरंजीव विशाल मोहनराव रसाळ व कळसंबर येथील रमाकांत वाघमारे यांची कन्या उत्कर्षा यांचा दोन्ही परिवाराकडील अगदी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्तीत शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत अगदी साधेपणाने कळसंबर येथे ३१ जुलै शुक्रवार रोजी १०:३० वाजता विवाह सोहळा संपन्न झाला. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत अगदी सध्या पद्धतीने विवाह केला आहे. या विवाह सोहळा प्रसंगी वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक उपस्तीत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांमुळे विवाह सोहळ्यात मुलींच्या पालकांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खर्च करून ही अनेक विवाह सोहळ्यात मान – सन्मान या कारणांमुळे भांडण – तंटे व्हायचे, डी. जे. समोर नाचण्यावरूनही अनेक ठिकाणी भांडणं व्हायचे ते प्रमाण आता पूर्ण पणे बंद झाल्याने. लॉक डाऊन नंतर सुद्धा विवाह करण्यासाठी अशाच प्रकारची नियमावली रहावी अशी प्रतिक्रिया समाजातून येते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button