बीड:आठवडा विशेष टीम―राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अंजिक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थी काँग्रेसने जिल्हा भरात विद्यार्थी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्नेहभोजन व खाऊ वाटप तसेच जागोजागी वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
या यात्रेस शाळा-महाविद्यालयांमधून उत्तम प्रतिसाद मिळत असून, अजिंक्य राणा पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले.
त्यांनी गेवराई येथील मुकबधीर शाळेला भेट देऊन शालेय साहित्याचे वाटप केले. त्यानंतर गढी येथील जय भवानी महाविद्यालय, बीड येथील बलभीम महाविद्यालयाला भेट देऊन शैक्षणिक विषयावर विद्यार्थांशी संवाद साधला. त्यानंतर म्हसोबा फाटा येथील संस्कूती शाळा,शिरूर कासार येथील जि.प.शाळेला भेट देऊन वृष लागवड व विद्यार्थांना शालेय साहित्यांचे वाटप केले.
यावेळी त्यांचे विवीध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अर्जुन क्षीरसागर, युवा नेते रणवीरसिंंह पंडीत,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, नगरसेवक रणजित बनसोडे, नगरसेवक गणेश तांदळे, नगरसेवक विशाल घाडगे, अमोल गायकवाड, आकाश कंडेरे, अनिकेत जाधव, जिवन मकर, अंजिक्य आनेराव, ज्ञानेश कुलकर्णी, रोहिदास भांबे, अभिजित तपसे, सोहेल शेख, अशोक नाडे, बाळा वकटे, प्रदिप जाधव, आकाश मडावी, नितीन साळवी, मयुर बडे, दिपक जाधव, अक्षय तिडके, शरद वाघ, केशव तांदळे, गणेश शिंदे,साळाप्पा रामेश्वर, आप्पा इंदुरे, करण भालशंकर, सुशेन आमटे,अनिकेत सुतार, लहु गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व महाविद्यालयातील प्रार्चांय,प्राध्यापक, जि.प.चे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थीं उपस्थित होते.