सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ उपाय योजनांच्या अंतिम टप्प्यात आता शासनाने तालुकास्तरावर जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमात जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी जिल्हा परिषद म्हणून ग्रामीण भागात नागरिकांना आणखी बळ देण्यासाठी ग्रामपंचायातींवर मंगळवारपासून धडकणार आहे.सोयगाव तालुक्यात या उपक्रमात गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी पहिल्याच टप्प्यात मंगळवारी ११ ग्रामपंचायतींना भेटी देवून जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमात कोविड-१९ ची माहिती घेवून गावातील कोरोटाईन झालेल्या परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची भेट घेवून काळजी घेण्याचे आवाहन केले.यावेळी सर्वच ग्रामसेवकांना गावातील ५५ ते ६० वर्षीय वृद्ध ग्रामस्थांच्या याद्या तयार करून तातडीने पाठविण्याच्या सूचना करून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
कोविड-१९ च्या उपाय योजनांच्या अंतिम टप्प्यावर शासन आले असून या अंतिम टप्प्याच्या उपाय योजनांच्या तयारीनंतर मात्र शासन केवळ नियंत्रणाचा अहवाल घेणार असल्याने आता कोविड-१९ ची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.असाही संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.