बातम्या
UPSSSC PET Exam Analysis 2025 Sept 6 Shift 1, Check Difficulty Level & Good Attempts UPSSSC PET 2025 Question Paper Out, Download Shift Wise UP PET Paper PDF RRB Ministerial & Isolated Categories Exam City Slip 2025 Out, Link Active, Admit Card DMER Hall Ticket 2025 Out @med-edu.in, Download Admit Card Link IB ACIO City Intimation Slip 2025 Out at mha.gov.in, Check Admit Card Date, City Slip Download Link RRB Railway Teacher Exam City 2025 Intimation Slip Out at rrb.digialm.com, Download MI Exam City, Schedule RRB NTPC UG Admit Card 2025 Out for 8th & 9th Sept Exam, Download Link Active AIBE 20 Notification 2025 Updates, Releasing Today, Registration Dates Navi Mumbai Police Bharti 2025: 445 Police Constable Posts | Application Dates, Eligibility, and Fee Structure मुंबई पोलीस शिपाई भरती २०२५: १५,६३१ पदांसाठी शासन निर्णय जाहीर; असा करा अर्ज UPSSSC PET Exam Analysis 2025 Sept 6 Shift 1, Check Difficulty Level & Good Attempts UPSSSC PET 2025 Question Paper Out, Download Shift Wise UP PET Paper PDF RRB Ministerial & Isolated Categories Exam City Slip 2025 Out, Link Active, Admit Card DMER Hall Ticket 2025 Out @med-edu.in, Download Admit Card Link IB ACIO City Intimation Slip 2025 Out at mha.gov.in, Check Admit Card Date, City Slip Download Link RRB Railway Teacher Exam City 2025 Intimation Slip Out at rrb.digialm.com, Download MI Exam City, Schedule RRB NTPC UG Admit Card 2025 Out for 8th & 9th Sept Exam, Download Link Active AIBE 20 Notification 2025 Updates, Releasing Today, Registration Dates Navi Mumbai Police Bharti 2025: 445 Police Constable Posts | Application Dates, Eligibility, and Fee Structure मुंबई पोलीस शिपाई भरती २०२५: १५,६३१ पदांसाठी शासन निर्णय जाहीर; असा करा अर्ज

सामान्यांचा आवाज, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी: डोंगरकिन्ही जिल्हा परिषद निवडणुकीत आप्पासाहेब येवलेंच्या नावाची चर्चा; विरोधकांना धास्ती

पाटोदा, २०जुलै (गणेशशेवाळे) : डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात सध्या एक नाव जनतेच्या ओठांवर आणि चर्चेत अग्रस्थानी आहे, ते म्हणजे युवा सरपंच आप्पासाहेब येवले. पारंपरिक राजकारणापलीकडे जाऊन केवळ आणि केवळ आपल्या कामाच्या बळावर त्यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

येवलेंचे शेतकरी कुटुंबातून आलेले नेतृत्व

आप्पासाहेब येवले हे मूळचे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे ग्रामीण जीवनशैली, अडचणी आणि गरजा त्यांना लहानपणापासून ज्ञात आहेत. डोंगरकिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करत असताना, त्यांनी गावात पायाभूत सुविधास्वच्छताजलव्यवस्थापनमहिला बचतगट सक्षमीकरण, आणि तरुणांसाठी रोजगार व प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ठोस पावले उचलली आहेत. त्यांचा प्रामाणिकपणा, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक निर्णय प्रक्रिया या तत्त्वांमुळे त्यांनी अल्पावधीतच लोकांचा विश्वास संपादन केला आहे.

राजकीय घराण्यांच्या मर्यादेबाहेर जनमानसात स्थान

डोंगरकिन्ही परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण हे काही मोजक्या घराण्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. मात्र, सध्याच्या घडीला गावागावातील युवक, शेतकरी, महिला आणि गोरगरीब वर्गात “आता आपला माणूस जिल्हा परिषदेवर पाहिजे!” असा एकच सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर, आप्पासाहेब येवलेंचे नाव केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता, आता ते जनतेच्या अपेक्षांचे आणि विश्वासाचे प्रतीक बनत चालले आहे.

कार्याचा ठसा आणि जाणकारांचे मत

आप्पासाहेब येवलेंचे कार्य पाहता, अनेक राजकीय जाणकार देखील मान्य करतात की, या भागाला केवळ बोलणारे नव्हे तर काम करणारे नेतृत्वाची गरज आहे. आप्पासाहेब येवले हे या सगळ्या गुणांची सांगड घालणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे जाणकार सांगतात. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये पैसा, जातीय समीकरणे आणि बाह्य प्रभाव यांचाच जोर राहिला आहे. पण आप्पासाहेब येवले यांनी या सगळ्याला फाटा देत केवळ जनतेच्या प्रेमावर आणि आपल्या कामगिरीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच अनेक पैशाच्या जोरावर निवडणुकीच्या तयारीत असणाऱ्या इच्छुकांना या तरुण नेतृत्वाची वाढती चर्चा मोठा धक्का ठरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि उमेदवारीचा प्रश्न

आप्पासाहेब येवले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) एक सक्रिय कार्यकर्ते असून, त्यांनी ग्रामस्तरावर पक्षाला मजबूत आधार दिला आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देईल का?” स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांपासून ते तरुण मतदारांपर्यंत एकच मागणी ऐकू येते आहे – “आप्पासाहेब येवले यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी द्यावी.”

ग्रामस्थांच्या अपेक्षा आणि सोशल मीडियावरील चर्चा

या गटातील अनेक ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटले की, “गावपातळीवर ज्याने आम्हाला अडचणीच्या काळात आधार दिला, रस्ते, पाणी, शौचालय यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठी लढा दिला, त्यालाच आम्ही मोठ्या व्यासपीठावर पाठवणार आहोत.” आप्पासाहेब येवलेंचे नाव सध्या सोशल मीडियावर, गावपातळीवरील चर्चांमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या गटांमध्ये अगदी उघडपणे घेतले जात आहे. कारण राजकारणात केवळ बोलणाऱ्यांपेक्षा काम दाखवणाऱ्यांची गरज आहे आणि आप्पासाहेब येवले यांनी त्यांच्या कार्यातून ही पात्रता सिद्ध केलेली आहे. त्यामुळे डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी नक्कीच चर्चेचा विषय ठरत असून, आशेचा एक महत्त्वाचा किरण मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *