Offer

पंकजा मुंडे समर्थ आहेत महाराष्ट्र भाजपाच नेतृत्व करायला…!

आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी मध्ये सध्या ओबीसी विरोधी घटना घडत असल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्यावर जनतेतून एकच आवाज उठत आहे पंकजा मुंडे ह्याच आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करू शकतील.भाजपा मध्ये गट बाजी कोणामुळे पडली हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे.खडसे ,तावडे आणि त्याचसोबत पंकजा मुंडेंना डावलून ह्यांना काय सिद्ध करायचे होते तेच कळत नाही.? भारतीय जनता पार्टीच्या एका नेता-कार्यकर्त्यांच्या फळीने पंकजाताई मुंडे यांचच नेतृत्व स्वीकारलं असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय स्तरावर सुरू आहे.पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार सारख्या योजना दुष्काळी भागात आणल्या त्याचा भरमसाठ फायदा देखील शेतकरी वर्गाला झाला ते ओळखून आता शेतकरी देखील पंकजा ताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवायला लागला आहे.

आघाडी सरकार कडून शेतकऱ्यांच्या लाभासाठी भारदस्त अशा योजना सुरू केल्या गेल्या नाही.केवळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकरी राजा सुखावत नसतो.ह्याचा मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला भविष्यात होणार आहे.भाजपाने मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेला एवढ्या जागा जिंकल्या परंतु महाराष्ट्र राज्यात मात्र ते सध्याच्या नेतृत्वाला शक्य झाले नव्हते. मात्र आता हीच वेळ आहे पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपाला पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये ऊदयास आणण्याची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button