अमृतसर (वृत्तसंस्था) दि.०४ : सोमवारी आपल्या मागण्यासाठी शेतकऱ्यांनी जंडियाला जवळ अमृतसर-जालंधर रेल्वेरुळावर आंदोलन केले.दुपारी २ वाजता शेतकरी रेल्वेरुळावर येऊन बसले होते.संध्याकाळ होईपर्यंत आंदोलन चालूच होते.शेतकऱ्यांच्या या रेल्वेट्रॅक वरील आंदोलनामुळे सोमवारी ६ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
त्याआधी तेथील शेतकऱ्यांनी भारतीय किसान युनियन च्या अंतर्गत समितीने सोमवारी सकाळी तारण जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले होते.मागण्या मान्य न केल्याच्या कारणाने शेतकरी रेल्वे ट्रॅक वर येऊन बसले.आंदोलनकरी शेतकऱ्यांनी दावा केला आहे की दोन वर्षात राज्यात ९०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
Punjab: Farmers in Amritsar protest by blocking a railway track demanding implementation of the recommendations of Swaminathan Commission report among other demands. pic.twitter.com/gfGLbfJlUO
— ANI (@ANI) March 4, 2019
डॉ स्वामिनाथन आयोग अहवालाची अमलबजावणी केली जात नाही.जंगली जनावरांमुळे पिकाचे नुकसान होत आहे त्यावर सरकारने उपाययोजना कराव्यात.