अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई शहरातील शासकीय दक्षता समितीने कोरोना संदर्भात तत्परता दाखवत नगरपरिषदेमार्फत बाहेरगावाहून आलेल्या नागरीकांची नागरी वस्तीबाहेर व्यवस्था करून त्यांना जीवनावश्यक सेवा पुरवाव्यात यासह विविध महत्त्वाच्या विषयांकडे सामाजिक कार्यकर्ते मनोज कदम,भीमसेन लोमटे,प्रमोद पोखरकर यांनी लक्ष वेधून जिल्हाधिकारी,बीड यांना रविवार,दि.17 मे रोजी निवेदन दिले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी,बीड यांना स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोजभैय्या कदम, सामाजिक कार्यकर्ते भीमसेन आप्पा लोमटे, प्रमोदभैय्या यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे महत्त्वपूर्ण विषयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.निवेदनात नमुद केले आहे की,अंबाजोगाई शहरात बाहेरगावांहून आलेल्या लोकांची व्यवस्था वस्ती बाहेर करून त्यांना जीवनावश्यक सेवा पुरवल्या जाव्यात जेणेकरून ते व्यक्ती समूहात येणार नाहीत.करिता आजची परिस्थिती पाहून या सर्वांना क्वारंटाईन करावे,अंबाजोगाई शहरातील मंगल कार्यालये, जि.प.शाळा हस्तगत करून या ठिकाणी सर्वांची सोय करावी,अंबाजोगाई शहरातील प्रभागनिहाय लोकांची नोंदणी करावी आणि संबंधीत नगरसेवक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचे संपर्क क्रमांक जाहिर करावेत.अंबाजोगाई शहरातील सर्व वस्तीनिहाय वेगवेगळी क्वारंटाईन वेगवेगळ्या निवासीत करावी.अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी या कोरोना संकटाच्या गंभीर परिस्थितीत उपाययोजनांसाठी शासनामार्फत देण्यात आलेल्या निधीचा सदउपयोग करावा व वरील बाबींवर तात्काळ नियोजन करावे.जेणेकरून अंबाजोगाई शहर हे कोरोनामुक्त राहील.
अन्यथा येणारा काळ खुप भयावह होईल.जर नगरपरीषदेमार्फत नियोजन करण्यास हय गय झाली तर येणा-या संकटाला नगरपरिषद मुख्याधिकारी यांना जिम्मेदार धरावे. यासाठी या कठीण प्रसंगात अंबाजोगाईकरांच्या हितासाठी फिजीकल डिस्टन्स पाळत जनआंदोलन केले जाईल. याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदक मनोजभैय्या कदम (महाराष्ट्र संपर्क प्रमुख,स्वाभीमान संघटना),सामाजिक कार्यकर्ते भिमसेनअप्पा लोमटे,प्रमोदभैय्या पोखरकर यांनी दिला असून निवेदनाच्या प्रतिलीपी 1)उपविभागीय अधिकारी,अंबाजोगाई,2)तहसीलदार,अंबाजोगाई,
3)पोलीस निरीक्षक,अंबाजोगाई,4.)मुख्याधिकारी,न.प.अंबाजोगाई यांना देण्यात आल्या आहेत.